अहमदनगर : राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर शिर्डी याठिकाणी गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या चिंतन शिबीराला उपस्थित राहिले आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्बेत ठिक नसल्याने त्यांच्यावर ब्रींच कॅंन्डी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी काल रूग्णालयातूनच शिबीराला ऑनलाईन उपस्थिती लावली. परंतु आज ते शिर्डी येथे शिबिरासाठी उपस्थिती राहिले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यावर भावनिक भाष्य केलं आहे.
“सुषमा अंधारेंना नजरकैदत ठेवले”; शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेत का?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चिंतन शिबीराला उपस्थित झाले, त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांचं उभं राहून टाळ्याच्या कडकडासह स्वागत केले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात घोषणा दिल्या. यावरून रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, तब्येत बरी नसतानाही पवार साहेब आपण राष्ट्रवादी मंथन शिबिराला उपस्थित राहून आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेत. आज तुमच्या हाताला इंजेक्शनची पट्टी होती. अशाही स्थितीत लढणारा तुमच्यातील योद्धा उद्या लोकशाहीवरील संकटाला परतवून लावल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास देखील रोहित पवारांनी व्यक्त केला.
दरम्यान, काल झालेल्या या शिबिरात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना केल्यात. तसेच त्यांनी या मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
तब्येत बरी नसतानाही आदरणीय पवार साहेब आपण ‘राष्ट्रवादी मंथन शिबिरा’ला उपस्थित राहून आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंत..
आज तुमच्या हाताला इंजेक्शनची पट्टी होती..
अशाही स्थितीत लढणारा तुमच्यातील योद्धा उद्या लोकशाहीवरील संकटाला परतवून लावल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास आहे. pic.twitter.com/9ToaL0kQXZ— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 5, 2022
Read also
- “खैरेंनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे”; शिवसेना अन् काॅंग्रेसमध्ये वाद सुरू
- “सभा घेण्यासाठी सुषमा अंधारेंना किती पेट्या मिळतात”; शिंदे गटाच्या आमदारांचा सवाल
- “संभाजी भिडेंनाही आपल्या सारखं व्यक्तिस्वातंत्र्य”; टिकली प्रकरणावर कडूंची प्रतिक्रिया
- “मुसलमान पांडुरंगाला मानतो, त्याच्यामुळेच मी मंत्री झालो”; अब्दुल सत्तार
- “नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे..;” जयंत पाटलांनी खडसावलं