मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील 16 आमदार बाद होणार आहेत. त्यामुळे सरकार वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसच्या 22 आमदारांना त्यांनी तयार ठेवले आहे. तसेच काॅंग्रेसचे 22 आमदार फुटले असल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यावर आता काॅंग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी खैरेंना आपले वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे.
चंद्रकांत खैरे यांनी अनेक वर्ष खासदार म्हणून काम केले असून ते शिवसेनेचे मोठे नेते आहेत. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात असताना खैरेंचे हे विधान संयुक्तिक नाही. त्यांनी हे विधान मागे घ्यावे, असे आवाहन सतेज पाटील यांनी खैरेंना केले आहेत. तसेच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत असून यात शरद पवार अन् उद्धव ठाकरे देखील सहभागी होत आहेत. त्यामुळे खैरेंनी गैरसमज पसरवू नये असंही ते म्हणाले.
“सरकार कोसळवणं हेच अजित पवारांचे काम, आम्ही फक्त जनतेसाठी..” दिपक केसरकर
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळालं नसल्याने त्यांचा चेहरा कायम पडलेला असतो. परंतु या पडलेल्या चेहऱ्यामागे फडणवीस हे मोठे डावपेच रचत आहेत. शिंदे गटाचे आमदार बाद झाल्यानंतर सरकारचे नुकसान होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत. शिंदे गटाचे आमदार बाद झालेत की, काॅंग्रेसचे 22 आमदार भाजपसोबत जातील. असंही ते म्हणाले.
अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांनी केले घरून मतदान..! ९१.१६ टक्के मतदारांनी बजावला हक्क
दरम्यान, तसेच आगामी निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, अशा राजकीय घडामोडीनंतर राज्यात केव्हाही राष्ट्रपती राजवट लागू शकतात. अन् विधान सभेच्या निवडणुका होऊ शकतात. तसेच राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून राज्यपाल कसे काम करतात हे सर्वांना माहिती आहे. असं म्हणत त्यांनी राज्यपालांना देखील टोला हाणला.
Read also
- “सभा घेण्यासाठी सुषमा अंधारेंना किती पेट्या मिळतात”; शिंदे गटाच्या आमदारांचा सवाल
- “संभाजी भिडेंनाही आपल्या सारखं व्यक्तिस्वातंत्र्य”; टिकली प्रकरणावर कडूंची प्रतिक्रिया
- “मुसलमान पांडुरंगाला मानतो, त्याच्यामुळेच मी मंत्री झालो”; अब्दुल सत्तार
- “नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे..;” जयंत पाटलांनी खडसावलं
- “सुषमा अंधारेंना नजरकैदत ठेवले”; शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेत का?