मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एका आठवड्याची मुदत दिली आहे. त्यामुळे आता सर्वाचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं आहे. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांबाबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…हे विधान टाळतं आलं असतं, पण.., वैफल्यग्रस्त भूमिकेतून, अजित पवार गटाचा सुळेंना टोला
एकनाथ शिंदे यांच्यासहित १६ आमदार अपात्र ठरतील, याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलेली आहे. आता फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे. मुडद्यात कितीही जान फुंकण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी विज्ञान आणि कायद्याला मर्यादा आहे. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. नाही तर संसदीय इतिहासात विधानसभा अध्यक्षांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल. अस संजय राऊतांनी म्हटलंय.
हेही वाचा…शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेकांच्या नियुक्त्या, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
दरम्यान, शेवटी हे सरकार फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार आहे. पैसे मिळाले असतील. परंतु इतर आश्वासने पुर्ण झाली नाहीत. दोन्ही पक्षातील १०० टक्के आमदार ईडी, सीबीआय, भीती आणि पैसे या मोहापायी आणि भीतीतून पळाले आहेत. असा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बहुजन समाजाने खडबडून जागं व्हावं..,”आव्हाडांचं आवाहन, केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी फक्त ३ च ओबीसी
हेही वाचा…“तर पिंपरी-चिंचवड, मावळ मतदारसंघात महिलाराज येईल,” राजकीय गणितं काय सांगतात ?
हेही वाचा…लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, राष्ट्रवादीत वाद वाढत चाललंय का ?
“समज देऊनही ऐकले नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना पक्षातून काढून टाकावे”, राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…“तर नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही..,” अजित पवार गटातील नेत्याचं राणेंना जोरदार प्रत्युत्तर