मुंबई : लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर काल काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थितीत केले. यामध्ये प्रामुख्याने भारत सरकार चालवणाऱ्या ९० सचिवांपैकी फक्त तीन ओबीसी समाजातील असल्याची माहिती राहुल गांधींनी सभागृहात निर्देशनात आणून दिली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. आता याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत.
हेही वाचा…शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेकांच्या नियुक्त्या, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी फक्त ३ ओबीसी समाजातील आहेत. देशाच्या अर्थसंकल्पातील केवळ ५ टक्के निधीवर त्यांचं नियंत्रण आहे, अशी चिंताजनक माहिती राहुल गांधींनी दिली असल्याचं आव्हाड म्हणाले. तसेच बहुजन समाजाने खडबडून जागं व्हावं अशी ही वेळ आली आहे. असं विधानही आव्हाडांनी करत एक प्रकारे आवाहनच केलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलंय, कुणी गल्लत करू नये,” ‘त्या’ फोटोवरून अजित पवार गटाची प्रतिक्रिया
दरम्यान, देशात किती ओबीसी, दलित, किती आदिवासी आहेत. असा प्रश्न राहुल गांधींनी केला. तसेच या प्रश्नांची उत्तर जातीच्या जनगणनेतूनच मिळू शकतात. त्यासाठी अगोदर जातीय जणगनणा करा. अन् महिलांविषयी ३३ टक्के आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. ते आजपासूनच लागू करा. अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी (आय ए एस) फक्त ३ ओबीसी समाजातील आहेत. देशाच्या अर्थसंकल्पातील केवळ ५% निधीवर त्यांचं नियंत्रण आहे, अशी चिंताजनक माहिती राहुल गांधी यांनी आज संसदेत दिली. बहुजन समाजाने खडबडून जागं व्हावं अशी ही वेळ आहे.
अभी नहीं तो कभी नहीं!#बहुजन
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तर पिंपरी-चिंचवड, मावळ मतदारसंघात महिलाराज येईल,” राजकीय गणितं काय सांगतात ?
हेही वाचा…लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, राष्ट्रवादीत वाद वाढत चाललंय का ?
“समज देऊनही ऐकले नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना पक्षातून काढून टाकावे”, राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…“तर नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही..,” अजित पवार गटातील नेत्याचं राणेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…हे विधान टाळतं आलं असतं, पण.., वैफल्यग्रस्त भूमिकेतून, अजित पवार गटाचा सुळेंना टोला