मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगासाठी स्वतंत्र्य मंत्रालयासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे गेल्या 25 वर्षापासून पाठपुरावा करणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे. यातच आता दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय होणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरणार आहे. त्यामुळे राज्यात आता दिव्यांगाकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
किर्तीकरांनी पक्ष सोडला, राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले, “उद्यापासून लोक त्यांनाही…”;
दिव्यांगांसाठी हक्कांसाठी आम्ही गेली 25 ते 26 वर्ष लढा देत आहे. त्याला आता यश आलं आहे. जागतिक अपंग दिनादिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून दिव्यांगासाठी स्वाधार योजना, गाडगेबाब घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मुकबधिरांसाठी खासगी क्षेत्रात काम मिळावं यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
“आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात”; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, येत्या 15 दिवसांत हे शासन मंत्रालय स्थापन करणार असून दिव्यांग मंत्रालय हा देशपातळीवरील मोठा निर्णय आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याचं आभार मानतो. दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ, रोजगार आणि शिक्षणामध्ये त्यांना संधी, मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी साईन लॅग्वेज विकसित करणं या गोष्टींची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी स्कॉलशीप मिळणं गरजेचं आहे. यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. असंही ते म्हणाले.
मग आता प्रश्न विचारल्यावर मिरच्या का झोंबतायत ? काॅंग्रेसचा तिखट सवाल
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवाना जाहीर आवाहन , सरकारने आपली २५ वर्षाची मागणी मान्य केली आहे. या गोष्टीच्या स्वागतासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात दि. १२ नोव्हेंबर, शनिवार रोजी १२ वाजता ढोल ताशाच्या गजरात या निर्णयाचे स्वागत व जल्लोष झाला पाहीजे. असं देखील बच्चू कडू यांनी आवाहन केले आहे.
Read also
- जितेंद्र आव्हाडांना काही तासातच जामीन मंजूर..! राष्ट्रवादीचा मोठा जल्लोष
- राजकारण पुन्हा तापलं…! जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..!
- अन् राहुल गांधींसमोरच मांडला कुस्तीचा फड..! कोल्हापुरचे रांगडे गडी एकमेकांत लढले
- “महाराष्ट्राच्या हातून अजून एक प्रकल्प गेला, विरोधकांचा सरकारवर निशाणा
- “राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाही, अनेक नेते भाजप अन् शिंदे गटात येणार”