पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. नागरिकांनी आज सकाळीच घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला आहे. यातच पुण्यातील अमृता देवकर यांनी थेट लंडनहून पुण्यात येऊन मतदानाचा हक्का बजावला आहे. काल सकाळी त्या लंडनहून निघाल्या होत्या. रात्री अडीच वाजता मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर त्या पुण्यात येऊन त्यांनी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्का बजावला आहे. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात, हे अनेकदा पुराव्यांसह उघड”
मतदाना हक्क कोणीही सोडू नये, कारण आपण आपली पुढची दिशा ठरवत असतो. तसेच आपल्या विकासासाठी योग्य प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार आपल्याला असतो. त्यामुळे ज्यांना ज्यांना मतदान करण्यास शक्य आहे. त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क सोडू नये. तसेच या पोटनिवडणुकीबाबत बातम्या येत होत्या. मला समजलं की या पोटनिवडणुकरीता हेमंत रासने उभे राहिले आहेत. त्यांचं काम मी लहानपणापासून पाहत आले आहे. त्यामुळे मनात विचार आला की आपण आपला मतदानाचा हक्का बजावला पाहिजे. अशी प्रतिक्रिया अमृता देवकर यांनी टी व्ही ९ शी बोलतांना दिली.
हेही वाचा…“सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं”, सदाभाऊ खोतांचं ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदार संघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. दुसरीकडे कसबा पेठ विधानसभा मतदार संघात २ लाख ७५ हजार ६७९ मतदार असून २७० केंद्रावर मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी १२५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील १३५ आणि चिंचवड मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख हे जिल्हायधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून संपुर्म मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत.
Read also
- हेही वाचा..“कसबा आणि चिंचवडवासियांनो, मोठ्या संख्येने मतदान करा”, फडणवीसांचं पुण्यातल्या मतदारांना आवाहन
- हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
- हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली
- हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..
- हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा