नाशिक : बांग्लादेश आणि श्रीलंकेत थांबलेली निर्यात, देशात इतरत्र झालेले उत्पादन यामुळे नाशिकसह महराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. यामुळे लाल कांद्याचे दर ५०० रूपये क्लिटलवर घसरले असून दर गडगडल्याने कांदा बाजारात विकण्याऐवजी रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यातच जगभरातील अनेक देशांत कांदा टंचाई आणि महागाईने तेथील जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. यावरून आता राष्ट्रवादीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आज छुप्या भेटीगाठी, उद्या मतदान
राज्यात लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट होऊन कांद्याचे दर ५०० रूपये क्लिंटलवर घसरले आहेत. दर गडगडल्याने कांदा बाजारात विकण्याऐवजी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र केंद्र व राज्य सरकार सत्ताकारण व निवडणुकीमध्ये दंग आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू त्यांना दिसत नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना परदेशात मात्र फिलिपिन्स, तुर्कस्थान, मोरोक्को, उझबेकिस्तान तसेच युरोपातील अनेक देशांत कांदा टंचाई निर्माण झाली असून कांदाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
हेही वाचा…“पुण्यात पैसाचा पाऊस, भाजपवर आरोप, कार्यकर्त्यांना अटक ” रवींद्र धंगेकरांकडून धरणे आंदोलन
राज्यात कांद्याचे दर चार वर्षातील निचांकी पातळीवर आले आहेत. घाऊक बाजारात कांद्याची मुबलक आवक होत असताना मागणी नसल्यामुळे दरात लक्षणीय घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकराने निर्यातीवरील निर्बंध उठवल्यास याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो व शेतकऱ्यांवरील हे संकट टाळता येईल.
हेही वाचा…सत्तासंघर्षाचा पेच मिटला, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू
दरम्यान, आज कांद्याची निर्यात सुरू असती तर परदेशातील कांद्याच्या महागाईचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना घेता आला असता. पण सरकार टिकवण्यात, एकमेकांना सांभाळण्यात आणि निवडणुकीतच राज्य सरकार सध्या गुंतल्याने याप्रश्नी त्यांच्याकडून केंद्राकडे काही पाठपुरावा होईल, अशी आशाच राहिली नाही. त्यामुलं २०२२ मध्ये शेतकऱ्यांचं उत्तप्न् दुप्पट कारण्याचं भाजपने दिलेलं आश्वासन पुर्ण झालं नसलं तरी तातडीने निर्यात बंदी हटवल्यास आज शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास तरी आवळणार नाही. त्यामुळे माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, कांद्याच्या या ज्वलंत प्रश्नावर आपण तातडीने लक्ष घालावं. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा…“समोर पराभव दिसताच, भाजपवर खोटे आरोप लावून मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचं धंगेकरांचं काम”
- हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर
- हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर
- हेही वाचा..““उद्धव ठाकरेंचे वडील वाघ होते, त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे, त्यांच्या पाठीमागे संपुर्ण महाराष्ट्र” अरविंद केजरीवाल
- हेही वाचा..““मला अडकविण्यामागे सर्वोच्च शक्तिमान माणसाचे कारस्थान”, आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे?