मुंबई : उद्धव ठाकरे याचा पक्ष व चिन्ह चोरीला गेले आहे. पम उद्धव ठाकरे यांचे वडील वाघ होते, त्या वाघाचे उद्धव ठाकरे पुत्र आहेत. आज संपुर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांच्यासोबत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे जिंकतील. ईडी सीबीआयचा वापर घाबरट लोक करतात. शेवटी सत्य जिंकते आणि विजय होतो. असा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर करत उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे संपुर्ण महाराष्ट्र असल्याचंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा..““निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले”, एकनाथ शिंदे
काल मातोश्रीवर अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मन, खासदार राघव चढ्डा, संजय सिंह यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी विविध विषयावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत विविध गोष्टींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं चिन्ह आणि नाव चोरीला गेलं आहे. परंतु संपुर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे असल्याचं सांगितलं.
हेही वाचा…“निवडणुक आयोग काय लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व,” शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
यातच उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं. तसेच अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान आले, याचा मला आनंद झाला असल्याचं ठाकरेंनी सांगितले. तर महाराष्ट्र आणि पंजाबचा संबंध भारताच्या स्वांतत्र्य लढ्यापासून आहे. पंजाबमध्ये भगतसिंह तर पुण्यात राजगुरूंनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो, असं भगवंत मान यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा…“कसब्याची जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायचीय,” चंद्रकांत पाटील
दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये आप आणि ठाकरेंची युती होणार का ? यावर उत्तर देतांना केजरीवाल म्हणाले की, निवडणुका आल्यावर यावर आम्ही भाष्य करू, परंतु देशात ज्यांची सत्ता आहे. ते २४ तास फक्त राजकारणावर बोलतात. परंतु उद्धव ठाकरे यांची खुप दिवसांपासून भेट घेण्याची इच्छा होती. त्यासाठीच मुंबईत आल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.
Read also
- हेही वाचा..““मला अडकविण्यामागे सर्वोच्च शक्तिमान माणसाचे कारस्थान”, आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे?
- हेही वाचा…प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आज छुप्या भेटीगाठी, उद्या मतदान
- हेही वाचा…“पुण्यात पैसाचा पाऊस, भाजपवर आरोप, कार्यकर्त्यांना अटक ” रवींद्र धंगेकरांकडून धरणे आंदोलन
- हेही वाचा…सत्तासंघर्षाचा पेच मिटला, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू
- हेही वाचा..““कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न”, शरद पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर