पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी दरम्यानच्या काळात पोलिसांना हाताशी धरून भाजपने पैसे वाटल्याचा आरोप काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्याचबरोबर निवडणुक आयोगाचा नियम ढाब्यावर ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील रात्री प्रचार करत होते. त्यांनी निवडणुक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी आज पुण्यात धरणे आंदोलना पवित्रा हाती घेतला आहे. त्यावर भाजपकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे.
हेही वाचा…दिल्ली, पंजाबचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटीला, मोदीविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली
मागील सात ते आठ दिवसांपासून भाजपकडून पैसे वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. याचे व्हिडीओ काढून आम्ही पोलिसांना दिलेत. रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत शंभर फोन पोलिसांना दिलेत. आम्ही स्वत: त्याठिकाणी हजर होतो. असं असतांनाही पोलिस यंत्रणा काहीही कारवाई करीत नाही. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, निवडणुक अधिकारी राधिका बारटक्के यांच्याकडे गेल्या सात दिवसापासून अनेक तक्रारी दाखल केल्यात. परंतु त्या तक्रारीची साधी दखल सुद्धा घेण्यात आली नसल्याचं काॅंग्रेसचे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आमदारांनी नियमाचा जो भंग केला आहे. त्यांच्यावर ताबोडतोब कारवाई झाली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा..““भाजपचे आक्रस्ताळे नेते फडणवीस आणि चित्रा वाघांसारखे वाचाळ कार्यकर्ते धर्माच्या नावाने पळापळ करताय”
आज पुण्यात पैसाचा पाऊस पडत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना बोलवून पोलिस दमदाटी करीत आहेत. या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडवी, आणि लोकशाही टिकावी यासाठी धरणे आंदोलन करीत असल्याचं काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे. पैसे वाटल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये सर्व काही दिसत आहे आणि हे सर्व पोलिसांना हाताशी धरून केलं जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी भाजपवर केला आहे.
हेही वाचा…राणेंना बाईनं पाडलं, अजित पवारांची टोलेबाजी, त्यात राऊतांनीही तेल ओतलं, म्हणाले, कमाल की चीज..
दरम्यान, भाजपवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे अन् बिनबुडाचे आहेत. समार पराभव दिसताच, भाजपवर खोटे आरोप लावून मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचं काम सुरू आहे. अशा पद्धीतीचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु कसब्यातील नागरिक सुज्ञ आहेत. ते अशा अफवांना बळी पडणार नाहीत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठी पदयात्रा झाली आहे. यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे तुम्ही पुरावे द्या, हे आरोप सिद्ध करा. असं आवाहन पुणे शहाराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी दिलं आहे.
Read also
- हेही वाचा…सत्तासंघर्षाचा पेच मिटला, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू
- हेही वाचा..““कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न”, शरद पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर
- हेही वाचा..““निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले”, एकनाथ शिंदे
- हेही वाचा…“निवडणुक आयोग काय लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व,” शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
- हेही वाचा…“कसब्याची जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायचीय,” चंद्रकांत पाटील