पुणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे रखडलेला शिंदे सरकारचा उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २७ फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांच्याशी भेट घेणार आहेत. या भेटीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात द्यावयाच्या भाषणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..““भाजपचे आक्रस्ताळे नेते फडणवीस आणि चित्रा वाघांसारखे वाचाळ कार्यकर्ते धर्माच्या नावाने पळापळ करताय”
निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्याने राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सुटल्यात जमा आहे. मात्र १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असूनही सर्वोच्च न्यायालयातील निकाल शिंदेंच्या बाजूने झुकला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या समोरील अडचणी काहीशा आता दुर झाल्या असून शिंदेंना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या २६ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचा विचार सुरू आहे.
हेही वाचा…राणेंना बाईनं पाडलं, अजित पवारांची टोलेबाजी, त्यात राऊतांनीही तेल ओतलं, म्हणाले, कमाल की चीज..
गेल्या सात ते आठ महिन्यापासून एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री धरून २० मंत्री कारभार पाहत आहेत. यातच आता दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला किती खाती मिळणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. शिंदे गटाकडे ९ तर भाजपकडेही ९ खाती सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे पुढच्या विस्तारात अपक्ष आमदार, आणि महिलांचाही समावेश केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“काँग्रेसने एलबीटी कर आणला, तो फडणवीसांनी बंद केला”, कसब्यात चंद्रकांत पाटलांचा घणाघात
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर रमेश बैस यांची राज्यपाला म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नव्या राज्यपालांची वैयक्तिक भेट घेतली परंतु त्यांच्याशी एकत्रित भेट होऊ शकली नाहीत. यातच आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही मंत्री राज्यपालांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा..““कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न”, शरद पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर
- हेही वाचा..““निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले”, एकनाथ शिंदे
- हेही वाचा…“निवडणुक आयोग काय लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व,” शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
- हेही वाचा…“कसब्याची जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायचीय,” चंद्रकांत पाटील
- हेही वाचा…दिल्ली, पंजाबचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटीला, मोदीविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली