मुंबई : इंजिनी्अर अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाची चौकशी पुढे सुरू ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर करमुसे मारहाण प्रकरणी तीन महिन्यांत तपास अहवाल द्यावा, अशा सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा तपास बंद करण्यात आला होता. या प्रकरणावरून मला अडकविण्यामागे सर्वोच्च शक्तिमान माणसाचे कारस्थान असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“निवडणुक आयोग काय लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व,” शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
ठाणे पोलिसांनी खोटे आरोपपत्र दाखल करून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असे कटकारस्थान सर्वोच्च शक्तीच्या नेतृत्वाखाली रचले जात आहेत. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. जे भाई लोक मोठ्या भाईलोकांशी दुबईमध्ये इथे तिथं बोलतात. त्यांच्या कसेस दाबल्या जातात. उलट आम्हालाच याबाबत प्रश्न विचारले जातात. असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर लगावला आहे.
हेही वाचा…“कसब्याची जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायचीय,” चंद्रकांत पाटील
तसेच अनंत करमुसे यांनी दाखल केलेल्या याचिकेत केलेली सीबीआय चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्याचबरोबर पोलिसांकडून तीन महिन्यात पुढील चौकशी अहवाल ट्रायल कोर्टात सादर करावा, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याचं आव्हाडांनी सांगितलं आहे.
नेमके प्रकरण काय?
अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 रोजी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह विधान केले, असा आरोप करत आव्हाड यांच्या समर्थकांनी अनंत करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. करमुसे हे घोडबंदच्या कावेसरमध्ये राहतात. येथून करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तिथेही मारहाण झाली. या प्रकरणी 14 ऑक्टोबर 2021 रोजी आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. या प्रकरणात करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
चौकशीचा झाला आनंद..!
करमुसे मारहाण प्रकरणाचा तपास महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आला होता. आता तो तपास पुढे सुरू ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत , अशी माहिती स्वतः अनंत करमुसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. करमुसे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही चौकशी बंद झाली. मात्र, ती आता सुरू झाली आहे. केंद्रीय यंत्रणा असो की, महाराष्ट्र पोलिस कोणीही चौकशी करावी. आव्हाडांची चौकशी होणार याचा मला आनंद आहे.
आज सकाळी मा. सर्वोच्च न्यायालयात अनंत करमुसे खटल्याचा निकाल लागला. निकालाची प्रत आताच हातात आली. त्यामध्ये याचिकाकर्त्यांनी CBI चौकशी मागितली होती ती नाकारली. तसेच 324 चे 326 करावे ही मागणी केली होती ती पण नाकारली
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 24, 2023
Read also
- हेही वाचा…प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आज छुप्या भेटीगाठी, उद्या मतदान
- हेही वाचा…“पुण्यात पैसाचा पाऊस, भाजपवर आरोप, कार्यकर्त्यांना अटक ” रवींद्र धंगेकरांकडून धरणे आंदोलन
- हेही वाचा…सत्तासंघर्षाचा पेच मिटला, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू
- हेही वाचा..““कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न”, शरद पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर
- हेही वाचा..““निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले”, एकनाथ शिंदे