औरंगाबाद : उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे दोन्ही शहरात सध्या लोकांकडून आनंद साजरा केला जात आहे. यातच हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपुर्ण जिल्ह्याचे यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा..““कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न”, शरद पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकार कोसळण्याच्या एक दिवस अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शहराच्या नामांतराला मंजूरी दिली होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर याच काही गोष्टी समाविष्ट करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. काल केंद्र सरकारच्या विभागाकडून दोन्ही शहराच्या नामांतरणाला अधिकृत मंजूरी देण्यात आली. त्यावरून दानवे यांनी काही सवाल उपस्थित केले.
हेही वाचा..““निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले”, एकनाथ शिंदे
हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की, सुंपुर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरम देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हापण संभाजीनगर असावा. ता. छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद. असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा. असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला होता. त्यावर आधी पुर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारच मंजूरीची प्रक्रिया पुर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसुचना जारी झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण झाले असल्याचं फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा…“निवडणुक आयोग काय लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व,” शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
त्याचबरोबर पुढे बोलतांना ते म्हणाले की, त्यानंतर महसुल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसुचना जारी करेल. तेव्हा संपुर्ण जिल्ह्याचे तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो, तेव्हा ते पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही. असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, केंद्र सरकारच्या नामांतरला आयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. याविरोधात त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात औरंगाबादचं राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
अंबादास जी,
आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. https://t.co/DyWaqjXlvO— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
Read also
- हेही वाचा..““उद्धव ठाकरेंचे वडील वाघ होते, त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे, त्यांच्या पाठीमागे संपुर्ण महाराष्ट्र” अरविंद केजरीवाल
- हेही वाचा..““मला अडकविण्यामागे सर्वोच्च शक्तिमान माणसाचे कारस्थान”, आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे?
- हेही वाचा…प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आज छुप्या भेटीगाठी, उद्या मतदान
- हेही वाचा…“पुण्यात पैसाचा पाऊस, भाजपवर आरोप, कार्यकर्त्यांना अटक ” रवींद्र धंगेकरांकडून धरणे आंदोलन
- हेही वाचा…सत्तासंघर्षाचा पेच मिटला, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू