मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातच आता या भेटीवरून भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टोलेबाजी करण्यात येत आहे. यातच रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक प्रहार करत अरविंद केजरीवाल यांच्यावर टिका केली.
हेही वाचा..““उद्धव ठाकरेंचे वडील वाघ होते, त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे, त्यांच्या पाठीमागे संपुर्ण महाराष्ट्र” अरविंद केजरीवाल
काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार राघव चड्डा, संजय सिंह देखील उपस्थित होते. भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदे घेतली. त्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून चिन्ह आणि नाव चोरून घेतले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांचे वडील वाघ होते. असं म्हणत संपुर्ण महाराष्ट्र त्यांच्यापाठीमागे आहे. असं केजरीवाल यांनी सांगितले.
हेही वाचा..““मला अडकविण्यामागे सर्वोच्च शक्तिमान माणसाचे कारस्थान”, आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे?
त्यावर आता भाजपच्या नेत्यांकडून जोरदार टिकास्त्र सोडण्यात येत आहे. सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं. अशी कोणती मजबुरी होती की ज्याला एकेकाळी वेडा म्हटला त्या केजरीवालांशी उद्धव ठाकरेंना हात मिळवावा लागला? असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं!
.
अशी कोणती मजबुरी होती की ज्याला एकेकाळी वेडा म्हटला त्या केजरीवालांशी उद्धव ठाकरेंना हात मिळवावा लागला?— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) February 25, 2023
Read also
- हेही वाचा..“मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली”, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
- हेही वाचा..“..तर शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास तरी आवळणार नाही”, रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
- हेही वाचा…“समोर पराभव दिसताच, भाजपवर खोटे आरोप लावून मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचं धंगेकरांचं काम”
- हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर
- हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर