औरंगाबाद : राज्यातील एकनाथ शिंदेंचं बंडाळी प्रकरण आता संपुर्ण महाराष्ट्राला माहिती झालं आहे. त्यासंबंधी अनेक वक्तव्य शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात येतेय. यातच मराठा समाजाचा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केल्याचं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यावर मराठा कधीही गद्दारी करीत नाही असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..““मला अडकविण्यामागे सर्वोच्च शक्तिमान माणसाचे कारस्थान”, आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे?
एका कार्यक्रमात गुलाबरा पाटलांनी एकनाथ शिंदे यांच्यावर वक्तव्य केलं. एक मराठा नेता शिवसेनेतून बाहेर पडत होता. त्यामुळे त्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी गद्दारी केली. तसेच त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. मी काय मुर्ख आहे का? कुणासाठी गद्दारी करण्यासाठी, ? मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली. असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यावर मराठ्यांचं नाव तुम्ही खराब करू नका. ज्या मराठ्यांनी गद्दारी केली, त्यांच नाव इतिहास कधीच नाही आलं. ज्यांनी आपल्या नेत्यावर निष्ठा ठेवली. त्यांचं नाव इतिहासात कोरलं आहे. त्यामुळे मराठा कधीही गद्दारी करणार नाही. असा पलटवार अंबादास दानवे यांनी गुलाबराव पाटलांवर केला.
हेही वाचा…प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आज छुप्या भेटीगाठी, उद्या मतदान
दरम्यान, मागील काहि दिवसापासून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि निवडणुक चिन्ह हे शिंदे गटाला बहाल केल्यानंतर राजकीय समीकरणं सगळी बदलली आहेत. यातच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील रखडलेला प्रश्न देखील मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आगामी दोन ते तीन दिवसापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.
Read also
- हेही वाचा..“..तर शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास तरी आवळणार नाही”, रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
- हेही वाचा…“समोर पराभव दिसताच, भाजपवर खोटे आरोप लावून मतदारांकडून सहानुभूती मिळवण्याचं धंगेकरांचं काम”
- हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर
- हेही वाचा…“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर
- हेही वाचा..““उद्धव ठाकरेंचे वडील वाघ होते, त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे, त्यांच्या पाठीमागे संपुर्ण महाराष्ट्र” अरविंद केजरीवाल