रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश राणे यांच्याकडून शिंदेंच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याच्या वेळी अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता. त्यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला हाणला आहे.
“त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही मोर्चा काढणार”; अजित पवार राज्य सरकारविरूद्ध आक्रमक
शिंदे गट ठाकरे गटात पुन्हा एकदा खिंडार पाडण्याच्या तयारीत आहे का विचारले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, खिंडार तर अगोदरच पडले आहे. तसेच खिंडारवाल्या पक्षाला अजून किती खिंडार पाडायचं. असं म्हणत त्यांनी ठाकरेंना शाब्दिक टोला हाणला आहे.
“सरकार बदलेलं त्यादिवशी सगळ्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल”; संजय राऊतांचा इशारा
दारु गोळा साठवून ठेवला आहे. जेव्हा गरज पडले तेव्हा बाहेर काढला जाईल, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर ते म्हणाले की, मनसेने कोणासोबत जायचं ते राज ठाकरेंच ठरवणार. कारण राज ठाकरे यांचं नाव महाराष्ट्रात अनेक राजकारणी नेत्यांपैकी एक आहे. तसेच राज ठाकरे आमच्याकडे आले तर त्यांचं स्वागतच करू. असंही ते म्हणाले.
“महाराजांनी ठरवलं असतं तर आजही राजेशाही अस्तित्वात असती,पण…;” उदयन राजेंचं सुचक वक्तव्य
दरम्यान, नाशिकमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे माजी 11 नगरसेवक आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणाऱ्या अजय बोरस्ते यांच्या घरासमोर पोलीसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Read also
- “वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलंय, सावध रहा;” रूपाली पाटलांचा घणाघात
- “मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
- “पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
- “हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
- “ठाकरेंना हिंदू मतं मिळणार नाही, म्हणून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा अंधारेंचा प्रयत्न”; भाजपची टिका