मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये सुषमा अंधारे साधु संत- हिंदू देवतांवर वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. यावरून राज्यात एक मोठा वाद निर्माण झाला आहे. तर वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून यामध्ये भाजपचे आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले वारकऱ्यांना चिथवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी तुषार भोसले आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
“सरकार बदलेलं त्यादिवशी सगळ्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल”; संजय राऊतांचा इशारा
आमच्या हिंदू-देवतांवर आणि संत परंपरेवर टीका करणाऱ्यांना पक्ष भाड्याने चालवायला दिला की काय परिणाम होतो. हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल. देवी-देवतांचा आणि संतांचा अपमान करणारे आज पक्षाचे प्रवक्ते म्हणून राज्यभर भटकत आहेत. तसेच आमच्या देवी-देवतांवर गरळ ओकत आहेत. अशी टिका तुषार भोसले यांनी सुषमा अंधारे आणि शिवसेनेवर केली आहे.
“महाराजांनी ठरवलं असतं तर आजही राजेशाही अस्तित्वात असती,पण…;” उदयन राजेंचं सुचक वक्तव्य
तुषार भोसले यांच्या टिकेला अनेकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज आहे. हा धुर्त, ढोंगी वारकरी संप्रदायाला धुळीस मिळवण्याचे काम करत आहे. वारकऱ्यांनो सावध रहा..! संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवणाऱ्यांचे वारसदार आहेत. असंही रविकांत वरपे यांनी इशारा दिला आहे.
वाहतुक कोंडीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार, जोरदार आंदोलन करत प्रशासन, शासनाला घेतले धारेवर
दरम्यान, वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलं आहे. ते स्वत: ला वारकरी समजतात, पण ते वारकरी नाही आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाला कुठेतरी गालबोट लागत आहे. भाजपच्या चोरट्या, अविचारी आणि धुर्त राजकारणी या लोकांना कोणीही आपल्या क्षेत्रात घेऊ नका. हे आपल्या क्षेत्राचं वाटोळं करून, माता बहिणींमध्ये झुंज लावण्याचं काम करतात. असं राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हटलंय.
Read also
- “मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
- “पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
- “हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
- “ठाकरेंना हिंदू मतं मिळणार नाही, म्हणून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा अंधारेंचा प्रयत्न”; भाजपची टिका
- “त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही मोर्चा काढणार”; अजित पवार राज्य सरकारविरूद्ध आक्रमक