मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच अभिनेता गोविंदा अहुजा याने आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याचसोबत अभिनेत्री करिना कपुर आणि करिश्मा कपूर यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
हेही वाचा…“दबंग युवा नेते वाघेरे, बांदल अन् मोरे ‘वंचित’ मधून लढणार?”, लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढती अटळ
अभिनेता गोविंदाने २००४ साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. गोविंदाचा प्रसिद्धी लक्षात घेतला त्याला तिकीट देऊन कॉंग्रेसने भाजपला बालेकिल्ली उद्धवस्त केला होता. त्यानंतरच्या काळात गोविंदाने राजकारणाला रामराम ठोकला होता. त्यानंतर आता पुन्हा त्याने राजकारणात एन्ट्री केली आहे.
हेही वाचा…“तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार,” कॉंग्रेसच्या विशाल पाटलांनी दिला इशारा, सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी
ठाकरे गटाकडून वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकरांच्या रूपात उमेदवार दिला आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे हे नवीन आणि लोकप्रिय चेहऱ्याच्या शोधात होते. त्यामुळे गोविंदाला त्यांनी पक्षात घेतल्याची माहिती आहे. आता गोविंदाला हा अमोल किर्तीकरांचं आव्हान कसं पेलणार हे पाहावं लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राऊतांनी तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं”, आंबेडकरांचा मोठा आरोप
हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का..! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द
हेही वाचा..भारती पवार यांना माहेरमधूनच प्रंचड विरोध ; विजयी होण्याचा मार्ग खडतर
हेही वाचा…मावळात सुनील शेळकेंनी घेतला युटर्न, श्रीरंग बारणेंचं टेन्शन कमी होण्याची शक्यता
हेही वाचा…“महायुतीत बंडाची पहिली ठिणगी” शिवतारेंचं बंड थंड, आता बुलढाण्यात शिंदे गटातून बंड ?