नाशिक : २०१९ साली राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या भारती पवारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. पहिल्यादांच खासदार झालेल्या भारती पवारांना भाजपने केंद्रीय राज्यमंत्री पद दिले. मात्र आपल्याच मतदारसंघात भारती पवारांनी कोणतेही काम न केल्याने मतदारसंघात त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी असल्याचे दिसून येत आहेत. अशातच भारती पवार यांचं माहेरगाव असलेल्या उमराणे गावातूनच आता भारती पवार यांना विरोध असल्याने निवडणुकीचा मार्ग आता खडतर झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…तिकीट कापण्याच्या भीतीने नाराजांची फौजच वर्षावर दाखल, खासदारांची भीती दूर करण्यासाठी मध्यरात्री खलबतं
कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड रोष बघायला मिळत आहे. कारण मुठभर लोकांसाठी हजारो शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करण्यात आलंय. संपुर्ण शेतकरी वर्गात नाराजी असून त्याचा नक्कीच परिणाम येत्या निवडणूकीत दिसणार आहे. माहेरवाशिण भारती ताई यांच्याकडून विकास कामांची अपेक्षा खुप होती. मात्र एकही अपेक्षा भारती ताई यांच्याकडून पुर्ण झालेलं नाहीय. उमराणे येथील उड्डाणपुलाचं काम फक्त लाईट लावण्याची गरज होती. मात्र ते पण झालं नाही. आतापर्यंत माहेरवाशिण म्हणून आम्ही पक्षविरहित त्यांना सांभाळत आलो आहे. सर्वं गावांनी ताईंना मतदान केलं होतं. परंतु मागच्या पाच वर्षात ताईंनी आम्हाला निराश केले आहे. अशी प्रतिक्रिया माजी सभापती विलास काका देवरे यांनी दिली आहे.
हेही वाचा…भारती पवारांना आपल्याच मतदारसंघात बसणार मोठा फटका ; भाजपसह मित्र पक्षातील नेत्यांची प्रचंड नाराजी
भारती पवारांकडून विकास कामांची खुप अपेक्षा होती. मागच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावरून निवडणुक लढवली. आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतांनाही त्यांना आम्ही मतदान केले. त्या निवडन आल्या. मात्र मध्यंतरी कांदा प्रश्न, द्राक्ष प्रश्न यावरून त्यांच्याकडून खुप अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांचं भंग झालंय. त्यामुळे समाज भारती पवार यांच्यावर प्रंचड नाराज आहे. आता आम्ही खुनगाठ बांधली आहे की, आपलं काम करणारा खासदार आम्ही निवडून देणार अशी प्रतिक्रिया देखील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…मावळात सुनील शेळकेंनी घेतला युटर्न, श्रीरंग बारणेंचं टेन्शन कमी होण्याची शक्यता
हेही वाचा…“महायुतीत बंडाची पहिली ठिणगी” शिवतारेंचं बंड थंड, आता बुलढाण्यात शिंदे गटातून बंड ?
हेही वाचा…“दबंग युवा नेते वाघेरे, बांदल अन् मोरे ‘वंचित’ मधून लढणार?”, लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढती अटळ
हेही वाचा…“तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार,” कॉंग्रेसच्या विशाल पाटलांनी दिला इशारा, सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी
हेही वाचा..नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाजलं, भुजबळांना उमेदवारी दिल्यास मोठ्या बंडाची शक्यता