नाशिक : भाजपने केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी पुन्हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला २०१९ साली राष्ट्रवादी सोडून भाजपात आलेल्या भारती पवारांना यावेळी मात्र मित्रपक्षच धक्का देण्याच्या तयारीत दिसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवारांचं नेमकं काय होणार ? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तर दुसऱ्या बाजूने विरोधकांनी पवारांना पाडण्यासाठी चांगलीच तयारी केली आहे.
हेही वाचा…‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, पुण्यात 1000 मल्ल मोहोळांचा करणार प्रचार
राष्ट्रवादीतून डावलल्यानंतर भारती पवारांनी २०१९ साली भाजपच्या तिकीटावरून निवडणूक लढवली. त्यामुळे विद्यमान खासदार हरिचंद्र चव्हाण यांचा पत्ता कट केल्याने स्थानिक पदाधिकारी भारती पवारांवर नाराज झालेत. यातच पहिल्यांदाच खासदार झालेल्या पवारांना केंद्रात राज्य केंद्रीय मंत्री पद दिले. मात्र गेल्या पाच वर्षात आपल्याच मतदारसंघात त्यांना कोणतेही काम करता आलेलं नाही. यातून मतदारसंघातील जनता नाराज झालीत. त्याच बरोबर भाजपसह मित्र पक्षातीलच नेते, कार्यकर्ते पवारांवर प्रचंड नाराज झालेले दिसून येत आहेत.
हेही वाचा…“मला बदनाम करण्याचा प्रयत्न , सगळ्यांची नावे समोर आणणार,” वडेट्टीवारांचा कॉंग्रेसच्याच नेत्यांवर घणाघात
भाजपच्या राज्यात व केंद्रात या दोन्ही ठिकाणी सत्ता आहे. यातच सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षांना कायम भारती पवार यांनी दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. शिवसेना शिंदे गटासह रिपब्लिकन पक्ष यांच्यासह अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील काही नेते भारती पवारांवर प्रंचड नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भारती पवारांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीचा बारामतीचा मार्ग मोकळा ! विजय शिवतारे – अजित पवारांमधील वाद फडणवीसांनी मिटवला…
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसला ठाकरे गटाकडून डच्चू ; लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट धंगेकरांसाठी करणार नाही काम
हेही वाचा..मोठी बातमी..! उद्धव ठाकरेंनी केली १६ शिलेदारांची यादी जाहीर, निवडणूकीत महायुतीला धोबीपछाड देणार
हेही वाचा…“महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा इशारा
हेही वाचा…“आम्ही इथे नरक यातना भोगतोय”, अन् तुम्ही नाटकं..,शिरूरमधून कोल्हेंना पत्र