मुंबई : आदित्य ठाकरे सोन्यासारखा मुलगा आहे. त्यांच्यासारखं युवा नेतृत्व मिळणं नव्या पीढीचं भाग्य आहे, आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीत हे नेतृत्व बावन्नकशी ठरणार आहे. याची शाश्वती विरोधकांना आहे. त्यामुळे त्यांना बदनाम करणारे विरोधकांचे हे निष्फळ प्रयत्न आहेत. अशी प्रतिक्रिया खासदार अरविंत सावंत यांनी दिली आहे.
“…तो पर्यंत सीमाभाग हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची सभागृहात मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भुखंडाच्या प्रकऱणावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. त्यानंतर सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना घेरलं. त्यातच शिंदे गटाचे लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यातच आता या संपुर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
“राष्ट्रवादीत घुसमट होत असून अजित दादा आमच्यासोबत आल्यास आनंद”
त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, यातून दुध का दुध और पानी का पानी होईल. असं म्हणत एनआय ही त्यांची पळवाट आहे. असंही सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच तपास यंत्रणा ह्या केंद्र सरकारच्या लॉण्ड्रि आहेत. त्या विशिष्ट लोकांसाठी लॉण्डि् असून बाकींच्यासाठी संडई आहे. असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.
Read also
- “नारायण राणेंचं कर्तृत्व शुन्य, त्यांना कवडीचीही किमंत कुणी देत नाही”
- बाळासाहेब थोरातांना भोवळ, हाताला, खांद्याला दुखापत, मुंबईत आणणार..
- “महाराष्ट्रातील सर्वात मोठा गद्दार, अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार…” अन् परिसर दणाणला
- संजय राऊतांनी ट्विट केला सुतळी बॉम्बचा फोटो, विरोधक धाकधुकीत
- “अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना घेतलं धारेवर, थेट राजीनाम्याची मागणी”