रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमचे १६ ते १६० आमदार होतील असं विधान केलं होतं. त्यावर तुम्ही स्वप्न बघणं बंद करा, तुमचे १६ ते ६ आमदारही निवडून येणार नाहीत. असा टोला शिंदे गटाने लगावला. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
महत्वाची गोष्ट म्हणजे जे गद्दार आहेत. त्यांना मी उत्तरं देत नाही. महाविकास आघाडी म्हणून आमचे १६० आमदार निवडून येतील. २०२४ ला नुतसं विधानसभेतच नव्हे तर लोकसभेतही आम्ही परिवर्तन करून दाखवणार. जे गद्दार गट आहेत, ते ३१ तारखेपर्यंत हातपाय मारू शकतात. त्यांना जे काही करायचं आहे ते त्यांनी करावं, गुजरातला जावं नाहीतर गुवाहाटीला जावं. पण आम्ही महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं आणि देशाचं काम करत राहू, असं ठाकरेंनी म्हटलंय.
हेही वाचा…“..तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”, गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद पेटला, खडसेंनी दिलं आव्हान
दरम्यान, आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून ते खळा बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी हे विधान केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राजस्थानमध्ये हिंदू ह्यदय सम्राट नावाचा वापर, मोदींची जादू संपली की काय?
हेही वाचा…‘’पिक्चर अभी बाकी है’’ म्हणत संजय राऊतांनी मकाऊतला ‘तो’ व्हिडीओ दाखवला!
हेही वाचा…चॉकलेटचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला आयोगाची आरोपीवर कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार गेम चेंजर, निकालानंतर मुंबईत, दिल्लीत बैठकांचा सत्र
हेही वाचा…“भाडोत्री प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा परराज्यात इतिहासात पहिलाच वापर “, शरद पवार गटाने एकनाथ शिंदेंना डिवचलं