रायगड : रायगडमधील खालापूर तालुक्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे यामध्ये १५ ते २० मुलांचाही समावेश आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या घटनेवर लक्ष्य ठेऊन आहेत.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची विधानसभेत एंट्री, सोमय्यांवर प्रश्न विचारले असता, म्हणाले की, “अशा…,”
राज्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात चांगला समन्वय दिसतोय. तिघेही वेगवेगळ्या ठिकाणावरून जनतेसाठी काम करताहेत. ज्यामुळे यंत्रणा हलवणे सोपी होत आहे व काम वेगाने होत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत दाखल झाले असून मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना जाहीर केली ५ लाखांची मदत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहोचले असून तिथून खालापूरनजीक इरशाळगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मृतांच्या वारसांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असून, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या वाडीतील ९० टक्के घरे ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.
READ ALSO :
हेही वाचा…माळीणची पुन्हा आवृत्ती, दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव
हेही वाचा…“सासू नाही तर दबंग मित्र म्हणून वाट्याला आलाय,” अजित दादांवर शहाजी बापूंचं मोठं विधान
हेही वाचा…पिता-पुत्र राजकारणात…! अजित पवार दिल्लीत सक्रिय, तर पार्थ आणि जय पवारांची राज्याच्या राजकारणात एंट्री
हेही वाचा…“तर त्याला ‘संतोष बांगर अन् मुख्यमंत्री’ जबाबदार,” अयोध्या पौळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी
हेही वाचा…अजित पवारांची बंद दाराआड चर्चा, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले, “राज्यात आता…”