मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दोन महिन्याचा कालावधी दिला आहे. दोन महिन्यानंतर आरक्षण दिला नाही तर मुंबईच नाकं बंद करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे आता खरी राज्य सरकारची मोठी कसरत पाहावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…नितेश राणेंचं पोस्टर गाढवाला लावून दिलं आव्हान, मराठा समाज राणेंच्या विरोधात आक्रमक
मराठा आरक्षणासाठी गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमुल्य सहकार्य केले. त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा…शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी संपली, आता ‘या’ तारखेला होणार पुढची सुनावणी
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला वेळ दिला आहे. परंतु तारखेत मोठी गोंधळ झाला आहे. २४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून न देण्यास जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. तर सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती जरांगे पाटील यांना केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“तब्बल ९ दिवस अन्नशिवाय उपोषण,” मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यविषयी आली मोठी माहिती
हेही वाचा…“अजित पवार गटात गेलेला शरद पवारांचा शिलेदार पुन्हा परतला, जोरदार स्वागत करत दिला प्रवेश
हेही वाचा…निवृत्त न्यायमूर्तींना मनोज जरांगे पाटलांनी केले कडक सवाल? मराठ्यांना आरक्षण मिळणार का ?
हेही वाचा…“मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळणार, परंतु त्यासाठी..,” निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमांतून जरांगे पाटलांशी चर्चा
हेही वाचा…मराठा आंदोलनाची धग कायम, राज्यात आज काय काय घडलं ?