जालना : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या नवव्या दिवशी मंत्रिमंडळ समितीच्या शिष्टाईनंतर आपलं उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. बेमुदत उपोषण मागे घेतलं असलं तरीही त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. सरकारने दोन महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र त्यांनी २४ डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. यातच आता मनोज जरांगे पाटील यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा…शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी संपली, आता ‘या’ तारखेला होणार पुढची सुनावणी
मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. यावेळी पोटात काहीच नसल्याने शरीरात ताकद राहिली नाही. त्यामुळे त्यांना निटपणे बोलताही येत नव्हते, तर ग्रामस्थांच्या आग्रहामुळे त्यांनी पाणी घेतले होते. यातच त्यांची शुक्रवारी वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा अहवाल समोर आला आहे.
हेही वाचा…“मराठ्यांनी मला वाचवलं, हल्ला करणारे दुसरेच ,”आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितली सगळी हकीकत
दरम्यान, गेल्या नऊ दिवसापासून काहीच न खाल्याने त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सुज आली आहे. उपचारानंतर ते पूर्ण बरे होतील. असे डॉक्टर विनोद चावरे यांनी सांगितले आहे. यातच आता सरकारकडून दोन महिन्यांची मुदत दिली आहे. मात्र त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही मुंबईचं नाक बंद करू अशा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार गटात गेलेला शरद पवारांचा शिलेदार पुन्हा परतला, जोरदार स्वागत करत दिला प्रवेश
हेही वाचा…निवृत्त न्यायमूर्तींना मनोज जरांगे पाटलांनी केले कडक सवाल? मराठ्यांना आरक्षण मिळणार का ?
हेही वाचा…“मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळणार, परंतु त्यासाठी..,” निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमांतून जरांगे पाटलांशी चर्चा
हेही वाचा…मराठा आंदोलनाची धग कायम, राज्यात आज काय काय घडलं ?
हेही वाचा…नितेश राणेंचं पोस्टर गाढवाला लावून दिलं आव्हान, मराठा समाज राणेंच्या विरोधात आक्रमक