मुंबई : खेडच्या विराट सभेतील उद्धव दर्शनानंतर भाजपने सुडाच्या राजकारणाचे पुन्हा एकदा त्यांनी त्यांची हिंस्र नखं बाहेर काढायला सुरूवात केली आहे. ईडी, सीबीआय, निवडणुक आयोग पोलीसी कारवाया यांचा ससेमिरा थांबतच नाही. परंतु आज रामदास कदमांनी त्यांचे सख्खे भाऊ सदानंद कदम यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करण्यासाठी भाजपने ज्या पद्धतीने तपास यंत्रणांना सोबत घेऊन ईडीची कारवाई केली असून ती अत्यंत वाईट असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..शेतकरी हीच आमची जात, जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? अजित पवारांचा संतप्त सवाल
सदानंद कदम यांची काल शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांचं स्वास्थ अजिबात चांगलं नसतांना सुद्धा ज्या पद्धतीने आज ईडीने ताब्यात घेतलं आहे. हे निंदनीय आहे. या देशामध्ये कसाबला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मग या देशाच्या नागरिकांना विना सुचना, विना नोटीस, इडी कशी काय ताब्यात घेऊ शकते? असा सवालही अंधारे यांनी केला आहे. या सुडाच्या राजकारणाला कुठंतरी पुर्णविराम मिळावा. असं आता सगळ्यांना वाटू लागल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा..“आपल्या अन्नामध्ये कांद्याचा खर्च किती? हा प्रश्न संसदेत मांडणार”, शरद पवार
तसेच एका सभेने गहाळ होऊन, घाबरून जाऊन भाजप जर सुडाचं राजकारण करत असेल तर आम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की, तुमच्या मात्रांचा आमच्यावर तिळमात्र फरक पडणार नाही. आम्ही लढत राहू, आम्ही जिंकत राहू असंही त्या म्हणाल्या.
Read also
- हेही वाचा..सोमय्यांना जोर चा झटका, फासे पलटले, मुश्रीफांवरील आरोप भोवले, चौकशीचे दिले आदेश
- हेही वाचा..“शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून बाहेर पडावं,” रामदास आठवले
- हेही वाचा..“बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सर्व सामान्यांशी नाही”
- हेही वाचा…नाना पटोलेंना काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? काय म्हणाले शिवाजीराव मोघे ?
- हेही वाचा…“राज्यात १४ मार्चला मोठा राजकीय भुंकप”, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा