मुंबई : १०० कोटी वसुलीप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून, सुप्रीम कोर्टात अटक होऊ नये म्हणून, त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर तसेच, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळण्यात यावेत, ही राज्य सरकारची याचिकाही कोर्टाने फेटाळल्यांनंतर, ईडीने देशमुख पिता-पुत्रांना कथित मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी, पुन्हा नवीन समन्स जारी करत सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते.
अखेर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर, पुणेकरांना दिलासा नाहीच
यातच आता ठाकरे सरकारने सीबीआयच्या दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळण्यात यावेत, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे, ईडीने नवीन समन्स जारी करत सोमवारी अनिल देशमुखांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, देशमुख आजही काही कारणास्तव चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे, त्यांच्या समोरील अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.
नागपूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एरवी तलवार घेवून बाहेर येणाऱ्या निलम गोऱ्हे आता कुठे आहेत?
दरम्यान, वाझेला पोलीस दलात घेण्यात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत देशमुखांचा हात होता, असं सीबीआयने त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. हेच मुद्दे गुन्ह्यातून वगळण्यात यावेत, कारण हे मुद्दे मंत्रालयीन आणि प्रशासकीय कामाचा भाग आहेत. त्यांची सीबीआय मुद्दाम चौकशी करु पाहत आहे, अशी याचिका सरकारने केली होती. ही याचिका फेटाळताना कोर्टाने देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू असून, यात हस्तक्षेप केला तर सत्य उघड करण्यात अडथळा येईल, असं सांगितलं.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. याचा आता सीबीआय आणि ईडी तपास करत असून, सचिन वाझे हे कोठडीत आहेत, तर अनिल देशमुख आजही चौकशी साठी हजार राहू शकले नाहीयेत.
Read Also :
- किती दिवस घरात बसायचे, निर्बंध उठवा; व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा – चंद्रकांत पाटील
- मुख्यमंत्री ठाकरेंची संभाजी भिडेंनी घेतली भेट; दोघांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा
- “मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण…”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
- मुंबई विमानतळावर शिवसैनिक राडा; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड उखडून फेकून दिला
- निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी केले मोठे विधान; व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार पण…