पुणे : आज पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, “अजित पवारांसारखा वक्तशीर आणि शब्दाला पक्का असा दुसरा माणूस नाही, पण विधिमंडळात एमपीएससीच्या जागा भरण्याबाबत दिलेला शब्द ते फिरवत असतील, तर मग हे कठीण आहे,” अशी टीका त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली.
“मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण…”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
“अजित पवारांनी विधिमंडळात ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली. पण आता मुदत उलटून गेली आहे. ते आपल्या शब्दावरून फिरत आहेत. प्रत्येकच विषयातच वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरुच आहे. हे खोटारडं सरकार आहे. लोक नक्कीच महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवतील,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी केले मोठे विधान; व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार पण…
दरम्यान, एमपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण होउनही पदे न भरल्याने स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने, राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. याच मुद्द्यावरून भाजपनेही विधिमंडळात महाविकास आघाडीला धारेवर धरले. विद्यार्थ्यांनीही राज्यभरात निदर्शने केली. याचा परिणाम म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत जागा भरण्यात येतील, असे जाहीर केले. त्यामुळे, आता प्रश्न असा उठत आहे की या घोषणेचा विसर, सरकारला पडला आहे का?
तसेच, मेट्रो ट्रायल वरून त्यांनी ठाकरे सरकार आणि अजित पवारांवर निशाणा साधला. “२०१६ मध्ये मेट्रोला परवानगी मिळाली. त्यावेळी ठाकरे सरकार नव्हतं. मात्र हा कार्यक्रम घाईने उरकून, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. विकासकामाला आमचा विरोध नाही. मात्र मेट्रोच्या कोणत्याही कामात मेट्रोचे प्रशासन, राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत करत आहे, त्यामुळे यापुढे आम्हाला कार्यक्रमाला बोलावलं नाही, तर कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा देत त्यांनी मेट्रो प्रशासनाचा निषेध केला.
Read Also :
- मुख्यमंत्री ठाकरेंची संभाजी भिडेंनी घेतली भेट; दोघांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा
- ५ मुद्द्यांवरून टोला लगावत भाजपने केला सवाल, “शरद पवारांनी केलेलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक नेमकं कशासाठी?”
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच भिडले शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते
- “भाजपचा अंतकाळ जवळ, कारण निष्ठवंतांना भंगारात आणि उपऱ्यांना, बाटग्यांना पालखीत नाचवलं जातंय”
- निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही, आता सर्वकाही मुख्यमंत्र्यांच्या हातात