सांगली : सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार पारिषद घेतली. यावेळी, “ज्या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तिथे दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवण्यात येणार आहेत. त्याबाबत आज संध्याकाळी निर्णय जाहीर करु,” असं मोठं विधान त्यांनी केलं. त्यामुळे, लवकरच काही जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल होणार असून, व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
तसेच, “येत्या काही दिवसांत निर्बंध शिथिल केले नाहीत, तर रस्त्यावर उतरु,” असा इशारा व्यापारी संघटनेनं दिला आहे. यावर ते म्हणाले, “मी अशा धमक्यांना घाबरत नाही. लोकांची सुरक्षा माझ्यासाठी महत्वाची आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन तयार होत नाही. आम्हाला त्याची चिंता आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही नियम पळत आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.
निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही, आता सर्वकाही मुख्यमंत्र्यांच्या हातात
“राज्यात आज १२५० ते १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करतो. मात्र संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल. मला विनंती करायची आहे कि प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालणे गरजेचे आहे. रुग्ण वाढ कमी होत नाहीत तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवतो आहोत,” अश्या सूचना त्यांनी केल्या.
निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच; वाचा महापालिकेचे नवे आदेश
यावेळी, “दुकानांच्या वेवेळेबाबतचा जीआर आज काढण्यात येणार आहे. मात्र लोकलमध्ये सध्या सर्वांना प्रवेश देणं शक्य नाही,” असं सांगत त्यांनी, “पुढील टप्प्यात लोकलमध्ये सर्वांना प्रवेश देण्यावर विचार केला जाईल. मात्र कार्यालयांनी पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे. कार्यालय प्रमुखांनी कामाच्या वेळा विभागून घ्या. शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करायला सांगा,” असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, उद्या केंद्रीय कॅबिनेटची बैठक; महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
Read Also :
- भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; गणेश बीडकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना आक्रमक
- ५ मुद्द्यांवरून टोला लगावत भाजपने केला सवाल, “शरद पवारांनी केलेलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक नेमकं कशासाठी?”
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच भिडले शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते
- “भाजपचा अंतकाळ जवळ, कारण निष्ठवंतांना भंगारात आणि उपऱ्यांना, बाटग्यांना पालखीत नाचवलं जातंय”
- पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी, पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा, संजय राठोड यांचा पाय खोलात