सांगली : कृष्णा नदीच्या महापुराने सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, आयर्विन पुल, हरभट रोड या भागांची पाहणी केली. दरम्यान, भिलवडी इथे त्यांची छोटेखानी सभा पार पडली. यावेळी, त्यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या, सरपंचांच्या वतीने देण्यात आलेली निवेदनेही त्यांनी स्वीकारली. दरम्यान, “या संकटातून मार्ग काढणारचं,” असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.
यानंतर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत घेतलेल्या आढावा बैठक आणि पत्रकार परिषदेत त्यांनी, “आपत्तीची वारंवारता पाहिली, तर त्यांचे स्वरूप भीषण होतेय. प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचताहेत, निसर्गासमोर हतबलता असते. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले. नदी पात्रातल्या पूर रेषेची अंमलबजावणी होत नसेल, तर त्यांना काय अर्थ? अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागेल, दरडग्रस्त ठिकाणातील बांधकामे दूर करावी लागतील,” असे त्यांनी सांगितले.
पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी मुख्यमंत्री, मंत्री येणार आणि चौकशी करून जाणार. असेच आयुष्य जगायचे का?
अतिवृष्टीचा इशारा येताच प्रशासनाने या भागातील लोकांचे लगेच स्थलांतर केले, जीव जाऊ दिले नाहीत.
हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच भिडले शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते
“आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणे सुरु झाले आहे. सांगली प्रशासनाला नागरिकांनी चांगले सहकार्य केले, या संपूर्ण भागात काही लाख लोकांचे स्थलांतर झाले, जीव वाचले. कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत महत्वाचे आहे. पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्वाचे. दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवण्याचा सूचना देखील आल्या आहेत. वडनेरे समितीसह सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून योग्य तो आराखडा करण्यात येईल. तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अंकलखोप येथे पूरग्रस्तांशी संवाद साधला;
आपत्तीनंतर तुम्हाला पायावर उभं करायची जबाबदारी आमची आहे.
ही अतीवृष्टी होण्याआधीपासूनच या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? असली थोतांडं करणार नाही!
“यापुढे विकास कामे करताना होणारा फायदा व नंतर निसर्ग, पर्यावरण या अनुषंगाने भविष्यातील होणारा तोटा याचा विचार करावा लागेल. आम्ही मागणी केली आहे. केंद्राने आता एनडीआरएफचे निकष सुधारावेत, व्यावसायिक, व्यापारी यांना विम्याची रक्कम महसूल विभागाच्या पंचनाम्यावर मिळावेत. सहाही जिल्हे पूर परिस्थितीपूर्वी कोरोनाशी लढताहेत. सांगली परिसरात चाचणी वाढावा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांचे जीव वाचविणे माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे,” अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
पावसाळ्यानंतर येणारे आजार होणार नाहीत यासाठी प्रशासनास सूचना दिली आहे.
मी सर्वांची निवेदने घेत आहे. सर्वांच्या सूचनांचा स्वीकार करणार आहे.
मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर चर्चा करू.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी, पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा, संजय राठोड यांचा पाय खोलात
“राज्यात आज १२५० ते १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करतो. मात्र संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल. मला विनंती करायची आहे कि प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालणे गरजेचे आहे. रुग्ण वाढ कमी होत नाहीत तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवतो आहोत. लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत,” अश्या सूचना त्यांनी केल्या.
राज्यपालांचे वागणे झालेय भाजपच्या कार्यकर्त्यासारखे; नाना पटोले यांची टीका
यावेळी, “राज्यावर संकटांची मालिका सुरूच आहे. आता आलेलं संकटही मोठं आहे. पण काळजी करू नका. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार आपलं आहे. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी भेटी दिलेल्या गावांतील ग्रामस्थांना दिली. आता उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. यात पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकार अजून काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Read Also :
- निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही, आता सर्वकाही मुख्यमंत्र्यांच्या हातात
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
- “भाजपचा अंतकाळ जवळ, कारण निष्ठवंतांना भंगारात आणि उपऱ्यांना, बाटग्यांना पालखीत नाचवलं जातंय”
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
- “सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल’’ सामनातून भाजप आमदारावर टीका