नागपूर : राज्यातली दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, ऑगस्टच्या शेवटपर्यंत संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले, तर लेव्हल ३ वर ११ जिल्ह्यांमधील निर्बंध ठेवले.
आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही ; दरेकरांचा शिवसेनेवर टीका
दरम्यान, तिसऱ्या लाटेमुळे हे निर्बंध कमी करायचे की नाही याबाबत राज्य सरकारमध्ये मतभेद असून, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना, “निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही. त्यामुळे, आता टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती दिली आहे.
संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? असली थोतांडं करणार नाही!
“कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. देशातील धोकादायक अशा १० राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. लॉकडाऊन करू नका ही व्यापाऱ्यांची भावना योग्य आहे, पण म्हणून ढिलाई महागात पडू शकते हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. शेवटी जीवही महत्त्वाचा आहे. त्यामुळे यातून सदाहकबधक चर्चा करून, व्यापाऱ्यांच्या भावनेशी सहमत राहून मुख्यमंत्री निर्णय घेतील,” असं ते म्हणाले.
टास्क फोर्सच्या मिटींगनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संचारबंदी बाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे, तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल
परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली, रायगड, ठाणे, मुबई, जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक
कोणत्या जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध कायम?
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, बीड, अहमदनगर
Read Also :
- बीडीडी चाळ पुनर्विकास: सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट?
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
- मुंबईतील मराठी आवाज टिकला आणि दिसला पाहिजे, बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस राज्यसरकार जबाबदार, एमपीएससीच्या जागेवरुन विद्यार्थी आक्रमक
- “सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल’’ सामनातून भाजप आमदारावर टीका