पुणे : ‘राज्यघटना मान्य नसेल तर अरबी समुद्रात बुडवा’ असे प्रक्षोभक विधान गणेश बीडकर यांनी केले आहे. त्यावरून आता शिवसेनाही चांगलीच आक्रमक झाली आहे. गणेश बीडकरांच्या खांद्यावर पक्षाची एवढी मोठी जबाबदारी असताना अशी बेताल वक्तव्य करताना काहीच कसं वाटत नाही. नेहमी चुका करायच्या आणि नंतर माफी मागून जनतेला वेठीस धरायचे, हे चालणार नाही. राज्य घटना समुद्रात बुडवीण्याची भाषा करताना बीडकरांना थोडी सुद्धा लाज वाटली नाही का?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. गणेश बीडकरांवर जनतेसमोर येवून जाहिर माफी मागावी आणि तात्काळ राजीनामा देवून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी केली आहे.
हे पण वाचा : “घटना समुद्रात बुडावा” भाजपच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
शिवसेना पर्वती मतदार संघांच्या वतीने स्वारगेटच्या जेधे चौकात आज तीव्र निदर्शने करण्यात आली. गणेश बीडकरांच्या खांद्यावर भारतीय जनता पार्टीची मोठी जबाबदारी आहे. पुणे महानगरपालिकेचे सभागृहनेते असून माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. अशावेळी भारतीय राज्य घटनेच्या संदर्भात अपमानास्पद वक्तव्य करून भारतीय घटना व संविधान याचा घोर अपमान केला आहे. एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी चुक केली तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते. मात्र, नेत्यांनी बेताल वक्तव्य केल्यास फक्त माफी मागायची आणि जनतेला वेठी धरायचे, हीच भाजपची चाल आहे का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे पण वाचा : “घटना समुद्रात बुडवा” भाजपने लोकशाही सोडून ठोकशाही आणली; गणेश बीडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा – काँग्रेस
दरम्यान, दोन दिवसापुर्वी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडू, अशी धमकी वजा इशारा दिला. त्यातच आता गणेश बीडकर यांनी भारतीय राज्य घटनेचा अवमान केला. त्यामुळे, भाजपा नेत्यांचे नेमके चाललेय तरी काय?, प्रसाद लाड आणि गणेश बीडकर यांना सत्तेचा माज चढलायं का?, असे प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे, बेताल वक्तव्य करणाऱ्या बीडकर आणि लाड यांना पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील काही समज देणार आहेत का?, भाजप पुणे शहरकडून काही कारवाई होणार का? कि घटने संदर्भात असे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गणेश बिडकर यांना भाजप पाठीशी घालणार? की “देखे को अंदेखा करके” बीडकरांच्या बेताल वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणार?, बीडकरांचे एवढे बेताल वक्तव्य असताना भाजप मुग गिळून गप्प का आहे?, असे प्रश्न आता जनता विचारू लागली आहे.
हे पण वाचा : “घटना समुद्रात बुडावा” म्हणणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेड आक्रमक
अगोदर चुक करायची आणि नंतर माफी मागुन जनतेला वेठीस धरायचे, हे चालणार नाही. कारण महाराष्ट्रसह आपल्या देशात विविध जातीधर्माचे लोक राहतात. त्यांच्या भावनेला ठेवू पोहचली आहे. त्यामुळे, गणेश बीडकर यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देवून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
Read Also :
- “तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, पायावर उभं करण्याची जबाबदारी आमची” मुख्यमंत्र्यांचे सांगलीकरांना आश्वासन
- निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही, आता सर्वकाही मुख्यमंत्र्यांच्या हातात
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
- “भाजपचा अंतकाळ जवळ, कारण निष्ठवंतांना भंगारात आणि उपऱ्यांना, बाटग्यांना पालखीत नाचवलं जातंय”
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी