मुंबई : सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरण तयार करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घेणे. त्याचबरोबर त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे. यासाठी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची सुरूवात आजपासून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. यावेळी अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्याच्या घरी जेवण देखील केलं.
“शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ देत”; नवनीत राणांचे गणरायाकडे साकडं
अब्दुल सत्तार यांनी धारणी तालुक्याती साद्रावाडी या अत्यंत दुर्गम, डोंगराळ, कोरडवाहू व आदिवासी बहुल गावात संजू धांडे, विनोद धांडे, अनिल धांडे, सुनील धांडे, रविंद्र सावळकर शैलेंद्र सावळकर परिवाराच्या घरी रात्री जेवण करून तिथेच ते मुक्काम राहिले. तसेच ते आज राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य व त्यातून उद्धवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे व ती राबवणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणीमांसा करून आत्मपरिक्षण करणे आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
“येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा”; शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
त्याधी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या समवेत राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व प्रधानमंत्री किसान सन्मान योजने संदर्भात ऑनलाईन प्रणाली द्वारे त्यांनी काल चर्चा देखील केली होती. या योजने अंतर्गत राज्यात आजअखेर एकून १ कोटी १० लाख लाभार्थ्यांना एकून ११ हफ्त्यात २० हजार २३५ कोटी रूपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असून ११ लाख ३९ हजार नवीन लाभार्थ्याचा डाटा अपलोड करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
“उद्धव ठाकरे साधा सरपंच देखील होण्याच्या लायकीचा माणूस नाही”; राणेंची जहरी टिका
त्याचबरोबर पात्र शेतकऱ्याची मोठी संख्या पाहता शेतकऱ्यांचे केवायसी प्रमाणीकरण करण्याकरीता केंद्र शासनाने सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे केली. या बैठकीस विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, सांख्यिकीय विभागाचे गणेश घोरपडे उपस्थित होते.
सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घेणे,त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकरी समस्यांचे मुळापर्यंत pic.twitter.com/Ow2RQQ6w2Z
— Abdul Sattar (@AbdulSattar_99) September 1, 2022
Read also
- शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ
- “बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार
- आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी
- “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी
- “ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला