पुणे : जालन्यात मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ल्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बुलढाणा येथे शासन आपल्या कार्यक्रमात अजित पवारांनी पाठ फिरवली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लेह मध्ये असल्याचं सांगण्यात आलं. यातच मागील दोन ते तीन दिवसापासून अजित पवारांनी कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहेत.
हेही वाचा…शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड, मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं
जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाला त्या दिवसानंतर अजित पवार एकाही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. किंवा ते कोणत्या बैठकीतही सहभागी जाले नाहीत. शनिवारी, रविवारी प्रामुख्याने अजित पवार पुणे आणि बारामतीला असतात. मात्र यावेळी ते मुंबईतच आहेत. शुक्रवारी रात्री लाठीचार्ज झाल्यानंतर शनिवारी त्यांनी चौकशी होईल असे म्हटले होते.
हेही वाचा…“हिंसक वळण देऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरूय,” अशोक चव्हाणांचा रोख नेमका कुणाकडे ?
दरम्यान, आंतरवाली सराटी गावात आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज जालना शहरात बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, सातारा, बारामती, तसेच खेड, दर्यापूर, बार्शीतही आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. यातच बारामतीत मराठा मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. “बाहेर पडा, बाहेर पडा, अजित पवार बाहेर पडा. अशा घोषणा देत बारामतीचा परिसर दणादणून सोडला.
READ ALSO :
हेही वाचा…तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार सत्तेतून बाहेर पडायची भूमिका घेतील का ?
हेही वाचा…“लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला,” राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ?” विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल
हेही वाचा…“महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे- भाजप सरकार..,! अजून किती अन्याय करणार महाराष्ट्रावर?”
हेही वाचा…“दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल