पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे काल दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन पार पडले, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाच्या अगोदर अजित पवार यांचे भाषण होणार होते. मात्र त्याआधीच व्यासपीठावरून अजित पवार वॉशरूमला गेले आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले. त्यानंतर माध्यमांनी अजित पवार यांना यासंदर्भात विचारल्यानंतर आम्ही वॉशरूमलाही जायचं नाही का असा सवाल केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून येतात, कोणाच्यात हिम्मत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजप नेत्यांना फटकारले आहे.
“पैठणचा बोक्या खोक्यावर जाणारा नाही”; रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापुर्वी केवळ शरद पवार यांच्याच अर्ज आला. मुळात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो. हे आपल्याला माहीत आहे. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असावेत अशी देशातील कार्यकर्ते, नते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. सगळ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी सर्वांची इच्छा मान्य केली, असं विरोधी पक्षनेते नेते अजित पवार म्हणाले.
“मुस्लिम समाजाने आपली डोके शाबुत ठेऊन उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहा”; भास्करराव जाधव
राष्ट्रीय अधिवेशनात मी न बोलल्याने माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ लावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीत झाले. या अधिवेशनात अजित पवारांना बोलण्याची संधी दिली नाही अशा बातम्या माध्यमांनी दिल्या. मात्र मी न बोलल्याने माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ लावला, असं अजित पवार म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या आजाराकडे गंभीरतेने बघावं” अजित पवार
राष्ट्रीय अधिवेशात राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे प्रांताध्यक्ष यांना बोलण्याची संधी असते. त्याठिकाणी मला कोणीही बोलू नका असे सांगितले नाही. वेळेअभावी मी एकटाच नाही तर सुनील तटकरे, वंदना चव्हाण तसेच इतर राज्यातील काही प्रतिनिधींनाही बोलता आले नाही. वस्तुस्थितीवर आधारित बातमी देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या माध्यमांवर आहे, असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- सोमय्यांचा घाव अनिल परबांवर बसला..! रिसोर्ट तुटणार, परब अडकणार..?
- तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!
- “उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात”
- “दिलेला शब्द पाळतो अन् एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही”; एकनाथ शिंदे