मुंबई : राज्यसभेवरर राज्यातील सहाही उमेदवारांसह राजस्थानमधून कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, गुजरातमधून भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा मध्य प्रदेशमधून केंद्रीय मंत्री एल. मुरूगन. ओडीशातून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा मंगळवारी निवडणुक आयोगाने केली. राज्यसभेच्या निवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज करण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे याठिकाणी आता बिनविरोध निवड झाली आहे.
हेही वाचा…“आता जाहिराती निघतील, मंजुर झालेलं आरक्षण लागू होणार का ?” देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी प्रतिक्रिया
निवडणुक आयोगाने जाहिर केलेल्या निकालांमध्ये भाजपचे सर्वाधिक २०, त्यानंतर कॉंग्रेसचे ६ तृणमूल कॉंग्रेसचे ४, वाययएसआर कॉंग्रसेचे तीन, राजदचे दतोन बिजदचे २ राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, जनता दल यु यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. २७ रोजी होऊ घातलेल्या राज्यसभेच्या ५६ पैकी ४१ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आता फक्त उत्तत प्रदेशातील १०, कर्नाटकमधील ४ हिमाचल प्रदेशमधील १ या जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
हेही वाचा…“निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारची नौटंकी”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
महाराष्ट्रातून बिनविरोध निवडून आलेल्या सहा जणांमध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे. राज्यातील सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर महायुती तसेच महाविकास आघाडीकडून विजत्या उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलं. तर मावळते खासदारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
EAD ALSO :
हेही वाचा…“तर मी साडीचा पदर खोचून उभी आहे”, नवनीत राणांनी थेट जलील यांना दिलं आव्हान
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजप पुन्हा मलाच संधी देणार, भाजप खासदार ‘हिना गावित’ हॅट्रिक साधणार का ?
हेही वाचा…राज्यात पुन्हा पुतण्याचा काकांना दे धक्का..! अजित पवारांचा पुतण्या शरद पवार गटात दाखल
हेही वाचा…“जरांगे पाटील आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात,” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“४२ वर्षापासूनचा लढा यशस्वी..!” कोर्टातही मराठा आरक्षण टिकणार, महेश लांडगे यांचा विश्वास