मुंबई : मविआतल्या जागावाटपातील जागा निश्चित झाल्या तर मग शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतल्या जागावाटपाचा भाग सुरू होईल. सगळ्याच शक्यता लक्षात घेत आणि अगदी वाईटात वाईट शक्यताही लक्षात घेत, जर कोणाचीच कोणाशी युती होणार नाही असं गृहित धरून आम्ही राज्यातील ४८ जागांच्या तयारीला लागलो आहोत. असं विधान वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यावर आता रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावर मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…भाजपाच्या ‘आयत्या पिठावर’ राष्ट्रवादीच्या इच्छुक ‘नागोबांच्या रेघोट्या’, श्रेय घेण्यासाठी चढाओढ : पण, सत्ता असताना प्रश्न सोडवता आले नाही
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा लढविण्याची वल्गना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबंडेकर यांनी करता कामा नये. आंबेडकर यांनी आपल्या सोबत येण्याची भूमिका घ्यावी. तसे झाल्यास प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले या दोघांची एकत्रित ताकद महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर वेगळा पर्याय देऊ शकते. मात्र, आपल्यासोबत येण्याचे धाडस ते का करीत नाहीत ? हे मोठे कोडे आहे. असं रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…शिवसेना 16 अपात्र आमदार सुनावणीचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी लागणार निकाल
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. यातच राज्यात महाविकास आघाडीत सध्या काॅंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट आहे. यातच वंचितसोबत ठाकरे गटाची युती झाली आहे. परंतु महाविकास आघाडीत त्यांना अद्यापही घेतलं नाही. यावर आता आंबेडकरांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधी पक्षनेता मंत्रिमंडळात दिसेल,” भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?” महाराष्ट्राच्या अन्नदात्याला, विद्यादात्याला वाऱ्यावर सोडतात! ठाकरे गटाची टिका
हेही वाचा…अजित पवार गटाची जॅम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे भाजपावाले किती पाखंडी”, काॅंग्रेसकडून ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत साधला निशाणा
हेही वाचा…शिंदे गट ठाकरेंच्या ‘या’ ४ खासदारांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत, कायदेशीर बाजू तपाण्यास सुरूवात