कोल्हापुर : कोल्हापुरात सध्या सुरु असलेली पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये होणाऱ्या या लढाईत कांटे की टक्कर होत आहे. कोणीही विजयाचा अंदाज लावू शकत नाही अशीच काहीशी परिस्थिती कोल्हापूर उत्तरेत निर्माण झालेली दिसत आहे.
राजकीय वातावरण तापलं! इडीची राऊतांवरील कारवाई अन् भाजपच्या माजी मंत्र्यांला 3 महिन्यांचा कारावास
महाविकास आघाडीकडून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तरुण मंत्र्यांची फौज उतरविण्यात आलेली आहे. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. काल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी देखील कोल्हापूर उत्तरेत सभांचे मैदान गाजवले आहे. संध्याकाळच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या सभेत धोधो पाऊस सुरु असताना महाविकास आघाडीच्या एकही मंत्र्याने ना कार्यकर्त्याने स्टेज सोडला नाही. अमित देशमुख यांनीही या मुसळधार पावसात आपलं भाषण सुरुचं ठेवलं. मुसळधार पावसातील अमित देशमुखांच्या भाषणाने जेष्ठ नेते शरद पवार यांच्या भाषणाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा कोल्हापुरात रंगली आहे.
“संजय राऊत हे धुतल्या तांदळाचा माणूस नाही”; इडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया
यावेळी अमित देशमुख यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं की, मनाचा मोठेपणा दाखवून निवडणूक बिनविरोध करायला हवी होती पण ते न करता भाजपकडून राजकारण केले जात आहे. काश्मीर फाईल्सपेक्षा कोल्हापूर फाईल्स महत्त्वाच्या आहेत. जनतेने भाजपच्या भूलथापांना बळी पडू नये. कोल्हापूरचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासनही अमित देशमुख यांनी दिले आहे.
“माझ्या हत्येचा हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन”; इडीच्या कारवाईनंतर राऊतांचा गंभीर आरोप
पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या पहिला महिला आमदार होण्याचा मान जयश्री जाधव यांना मिळणार असल्याचाही विश्वास बोलून दाखवला आहे. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, भारती पोवार, विनायक सूर्यवंशी, दुर्गेश लिंग्रस, विशाल देवकुळे, प्रकाश चौगले, सोनाली माने आदी उपस्थित होते.
Read also:
- भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंना 3 महिन्याचा तुरूंगवास; नायब तहसीलदार मारहाण प्रकरणी
- हिंदू एकता आवाज आलाच पाहिजे, मंदिरावरील भोंगे मोफत देऊ; भाजप नेत्याची घोषणा
- राजू शेट्टींची मोठी घोषणा; शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर
- ‘मविआ’ मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे सेटिंग
- देशात खरंच लोकशाही राहिली आहे का? राऊतांवरील इडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचा सवाल