मुंबई : सध्या राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे. त्याला कारणही तसेच समोर आले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षात मंत्री मंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री मंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून काही नेत्यांना डच्चू मिळणार असल्याचे बोलले जातेय.
इडीचा संजय राऊतांना मोठा दणका; अलिबागजवळील जमीन, दादरमधील फ्लॅट जप्त
स्वतःच्या पदरात मंत्रिपद मिळावण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडकडे सेटिंग लावल्याचे बोलले जातेय. फक्त प्रदेशाध्यक्षपदच नाही तर एखादं वजनदार मंत्रिपद मिळावे यासाठी नाना पटोले यांनी आग्रही मागणी केलीय. मागच्यावेळी जेव्हा फेरबदल करण्यात आले होते तेव्हा नाना पटोलेंना मंत्रिपद देण्यात आले नव्हते, मात्र यावेळी आता मागणी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीवर नाराज; दिल्लीतील बैठकीत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’
मागील काही दिवसांमध्ये ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्या मंत्र्यावरील छापेमारीमुळे तीन मंत्र्यांची मंत्रिपदे गेली. त्यांच्या रिक्त असलेल्या जागांवर आता इतर नेत्यांना संधी मिळणार असल्याचे बोलले जातेय. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यामधील काही नेत्यांना आता मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे तर रिपोर्ट कार्ड खराब असणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचे चर्चा मागील काही बैठकांमध्ये झालीय. गृहखात्याकडून भाजपवर काहीचं कारवाई होत नसल्याची चर्चा सर्वदूर आहे. भाजपकडून होणाऱ्या आरोपांवर, केंद्रीय यंत्रणांच्या छापेमारीला आतापर्यंत गृहमंत्र्यांनी आक्रमकतेने उत्तर दिलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला त्यावेळी त्यांना योग्यरीत्या कचाट्यात गाठता आले असते असा शिवसेनेचा सुर असताना, गृहमंत्र्यांनी मात्र नरमाईची भूमिका घेतली.
राज ठाकरे साहेबांवर नाराज नाही, पण भूमिका काय घ्यावी, समजत नाही? वसंत मोरे
त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादीकडून हे गृहखाते काढून घेऊन आम्हाला मिळावे यासाठी आग्रह धरला आहे. शिवसेनेकडील वन खाते राष्ट्रवादीला देऊन गृहखाते घेण्याची मागणी होत आहे. तसेच काँग्रेसला राष्ट्रवादीकडील अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय खातं हवं असल्याची मागणी चर्चेतून बाहेर पडलीय. एवढंच नाही तर आता कोरोनाची महामारी राज्यात ओसरली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मंत्र्यांना जनतेच्या समोर जावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा नव्या दमाने राज्याच्या जनतेसमोर जाण्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जातेय. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत ज्या काही हालचाली सुरु आहेत, त्याचा त्यांना फायदा होणार की तोटा याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- देशात खरंच लोकशाही राहिली आहे का? राऊतांवरील इडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
- राजकीय वातावरण तापलं! इडीची राऊतांवरील कारवाई अन् भाजपच्या माजी मंत्र्यांला 3 महिन्यांचा कारावास
- “संजय राऊत हे धुतल्या तांदळाचा माणूस नाही”; इडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया
- “माझ्या हत्येचा हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन”; इडीच्या कारवाईनंतर राऊतांचा गंभीर आरोप
- त्यांची मानसिक तयारी होती तर..; इडीने राऊतांवर केलेल्या कारवाईवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया