पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. याआधी आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही काळ पाहिला आहे. मात्र नरेंद्र मोदी हे देशासाठी वीस तास करणाऱ्या पंतप्रधानांपैकी एक आहेत. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किमंत नव्हती. आमच्या प्रथा, परंपरांना लोक नावे ठेवायची, मात्र आज मोदींमुळे जगात गौरव वाढला आहे. अशा शब्दात राज्याचे राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि पुणे शहाराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
इच्छुकांना अजून कळ काढावी लागणार; महापालिका, ZP निवडणुका आता पुढच्याच वर्षी
नरेंद्र मोदींच्या आधी भारताला ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ. राजेंद्र प्रसाद ,पं. जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या नेत्यांच्या विद्वत्तेमुळे जगभराने भारताला मुजरा केला आहे. मोदीचे एजंट बनलेल्या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रातून लवकर काढता पाय घ्यावा. असा टोला अमोट मिटकरी यांनी लगावला आहे.
इच्छुकांना अजून कळ काढावी लागणार; महापालिका, ZP निवडणुका आता पुढच्याच वर्षी
देशात सध्या महागाईने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट बिघडलं आहे. जुलै पासून अनेक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशानात देखील याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. यावरून देशव्यापी आंदोलन देखील करण्यात आले. यातच मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय निर्वीवादपणे शौचालय सम्राट अतुल भातखळकर यांना जातं. अशी खोचक टिप्पणी प्रशांत जगताप यांनी केलं आहे.
कावळे संपतील, गायी राहतील..! जे. पी नड्डाजी, जरा जपून..!
राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं, पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही. आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे. त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे. असं देखील रोहित पवारांनी म्हटलं आहे.
Read also
- नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण
- आता गुलाल पुढच्याच वर्षी; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक प्रक्रिया स्थगित
- “राज्यात कुठेही संकट आले तर राष्ट्रवादीची टोपी सगळीकडे दिसायला हवी”
- “आगामी महापालिका, ZP व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल”
- पाटलांच लेक राजकारणात होतंय सेट