अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जिवाला धोका आहे. अश्या निनावी पत्रामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांच्या घरी हे पत्र आले आहे. या पत्रामुळे नवनीत राणा यांच्या जिवाला धोका असल्याचं समोर येत आहे. खासदार राणा यांच्या अज्ञात हित चिंतकाने सावध राहण्याचे आवाहन राणा यांना करण्यात आलं आहे. खरच नवनीत राणा यांच्या जिवाला धोका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
“मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत, ही फार मोठी शोकांतिका”
मी तुम्हाला माझे नाव सांगू शकत नाही. मी तुमच्या शहरातील एक नागरिक आहे. मी तुम्हाला सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. कारण काही लोक तुमचा पाठलाग करत आहेत. मी एक सरकारी कर्मचारी असून तुम्ही माझ्या अनेक कामांमध्ये मला मदत केली आहे. तुम्ही माझी बदली करण्यात मदत केली होती आणि माझ्या वडिलांना कोरोना झाला त्यावेळी खुप मदत केली होती.
“स्मृती ताई, नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून बोलतात”
राजस्थान बॉर्डर येथून काही संशयित लोक अमरावतीत आले आहेत. हे संशयित लोक तुमच्या घराबाहेरही येऊन गेले असल्याची मला माहिती मिळाली आहे. मी हीच प्रार्थना करतो की तुमच्यासोबत काही वाईट घडू नये आणि तुम्ही असच मोठ मोठ्या पदावर जावं, असं या पत्रात म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांचे झंझावत दौरे; 30 जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्र फिरणार
नवनीत राणा यांच्या घरी आलेलंं पत्र हे हिंदी भाषेतील आहे. ते कुठून आले कोणी पाठवले ही माहिती अज्ञाप समोर आलेली नाही. या पत्राची पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेणार का? आणि खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेत आणखी वाढ केली जाणार का? हे पाहणं महत्वाचे आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाशी या घडामेडींचा काही संबंध आहे का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read also
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही दे धक्का..
- “ते दिवस रात्र स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नात राहु द्या,”शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर
- “महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होईल”; संजय राऊतांचे भाकित
- पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
- “संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”