पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारत भाजपसोबत युती केली. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असतांना भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. त्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी तसं बोलून दाखवलं. यातच आता भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील आपली खंत व्यक्त करून दाखवली आहे.
हेही वाचा…“मोदीने केलेल्या कामावर विश्वास असेल तर भाजपने बॅलेट पेपर वर निवडणुका लढव्याव्यात”
राज्यातील भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला जून महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहेत. मात्र अद्यापही भाजप नेत्यांच्या पचनी त्यांचे मुख्यमंत्री पद पडल्याचे दिसत नाही. भाजपचे माजी आमदार आणि पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या एका विधानामुळे या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
हेही वाचा…रिट्विस्ट…! “आर्यन खान ला सोडण्यासाठी वानखेडेंनी शाहरूख खानकडून २५ कोटी घेतले,” सीबीआय
पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना “जेंव्हा आपले सरकार आले तेंव्हा आमच्या मनामध्ये असणारी भावना पूर्ण झाली नाही. ती सल आजही मनामध्ये कायम आहे. अनेक दिवस त्याच्यातून बाहेर पडू शकलो नाही. मात्र भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी आपण असायला पाहिजे, त्याच्या पुढच्या पदावर देखील तुम्ही जायला पाहिजे.” असं जगदीश मुळीक म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…डीआरडीओ कुरूलकर प्रकरणात नवी माहिती, वायुदलाचा अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये
हेही वाचा…“..तर त्यांना अजीबात सोडणार नाही, सगळं बाहेर काढू, “देवेंद्र फडणवीसांनी थेट इशाराच दिला
हेही वाचा…“पुणे जिल्ह्याचं विभाजन करून त्याला ‘शिवनेरी’ नाव द्या,” महेश लांडगेंची फडणवीसांकडे मागणी