मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामधील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आला आहे. याबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराची फडणवीसांशी जवळीक, पिंपरीच्या कार्यक्रमात…
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाजवी कालावधीत निर्णय घ्यायचा आहे. तो वाजवी कालावधी किती दिवसांचा असेल, हे मी आज तुम्हाला सांगू शकत नाही. कारण ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठई जेवढा वेळ लागेल, तोच वाजवी कालावधी असेल.
हेही वाचा…“लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र होणार”, अजित पवारांचं आगामी निवडणुकांबाबत मोठं विधान
दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा. अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. राहुल नार्वेकर यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…डीआरडीओ कुरूलकर प्रकरणात नवी माहिती, वायुदलाचा अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये
हेही वाचा…“..तर त्यांना अजीबात सोडणार नाही, सगळं बाहेर काढू, “देवेंद्र फडणवीसांनी थेट इशाराच दिला
हेही वाचा…“पुणे जिल्ह्याचं विभाजन करून त्याला ‘शिवनेरी’ नाव द्या,” महेश लांडगेंची फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…“मोदीने केलेल्या कामावर विश्वास असेल तर भाजपने बॅलेट पेपर वर निवडणुका लढव्याव्यात”
हेही वाचा…रिट्विस्ट…! “आर्यन खान ला सोडण्यासाठी वानखेडेंनी शाहरूख खानकडून २५ कोटी घेतले,” सीबीआय