पुणे : अकोला आणि नगर जिल्ह्यात झालेल्या दंगलीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे. त्यावरून आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणावरून कडक शब्दात इशारा दिला आहे.
हेही वाचा…जयंत पाटलांना ईडीची दुसऱ्यांदा नोटीस, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
अकोला आणि नगर दोन्ही ठिकाणी शांतता आहे. दोन्ही ठिकाणी पोलीस अलर्ट मोडवर होते. जिथे गरज होती, तिथे अतिरिक्त पोलीस कूमक पाठविली होती. आता संपुर्ण स्थिती शांततापुर्ण आहे. कुणीतरी जाणूनबूजून राज्यातील शांततेचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था प्रयत्न होतो आहे. असा जो प्रयत्न जे करतात. त्यांना अजीबात सोडणार नाही. असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. काही संस्था, व्यक्ती हा प्रयत्न करीत आहेत, योग्यवेळी सर्व काही बाहेर आणार. असंही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“भाजपला हरवायचं असेल तर आघाडीने असदुद्दीन ओवेसीचं नेतृत्व स्विकारावं,” इम्तियाज जलील
ठाकरे गटाच्या नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सध्या राज्यात जे चालले आहे, तो कोणत्या लोकशाहीत बसते ? आम्ही विधानसभा अध्यक्षांना चालू देणार नाही, फिरू देणार नाही, घेराव करू, अशी भाषा वापरली जाते आहे. ठाकरे गटाची बाजू कमकुवत आहे, हे त्यांना माहिती असल्यानेच अशी भाषा वापरली जाते आहे. विधानसभा अध्यक्ष हे स्वत: एक निष्णात वकील आहेत. ते कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. रिझनेबल टाईमचा अर्थ त्यांना कळतो आणि मला खात्री आहे की, कोणत्याही दबावाला बळी न पडता. ते कायदा-संविधानसंमत निर्णय घेतील.
महाराष्ट्रात दंगली घडवू देणार नाही, ज्यांचे प्रयत्न, त्यांना अद्दल घडवू: फडणवीस
(माहितीसाठी संवादाची लिंक : https://t.co/XSjb23kUoc )
पुणे, 15 मे
महाराष्ट्रात कुणालाही दंगल घडवू देणार नाही आणि जे असा प्रयत्न करताहेत, त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्याचे… https://t.co/PmtGGpTVYY— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) May 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पुणे जिल्ह्याचं विभाजन करून त्याला ‘शिवनेरी’ नाव द्या,” महेश लांडगेंची फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…“मोदीने केलेल्या कामावर विश्वास असेल तर भाजपने बॅलेट पेपर वर निवडणुका लढव्याव्यात”
हेही वाचा…रिट्विस्ट…! “आर्यन खान ला सोडण्यासाठी वानखेडेंनी शाहरूख खानकडून २५ कोटी घेतले,” सीबीआय
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराची फडणवीसांशी जवळीक, पिंपरीच्या कार्यक्रमात…
हेही वाचा…“लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र होणार”, अजित पवारांचं आगामी निवडणुकांबाबत मोठं विधान