भंडारा : राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या तयारीत राज्य सरकार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. यातच भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा दिवाळीपर्यंतच पगार होणार असून तिजोरीत पैसे नसल्याने जिल्ह्यातील ३२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे भाजपावाले किती पाखंडी”, काॅंग्रेसकडून ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत साधला निशाणा
भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तरतूद केलेल्या ७२ लाखांमधून दिवाळीपर्यंतच तासिका शिक्षकांचा पगार होऊ शकतो. जिल्हा परिषदेने याबाबत राज्य सरकारला अनेकदा पत्र व्यवहार करूनही त्यांना वाढीव निधी मंजूर झालेला नाही. राज्य सरकारच्या चुकीमुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी योग्य ती कार्यवाही केली पाहिजे. अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसने केली आहे.
हेही वाचा…शिंदे गट ठाकरेंच्या ‘या’ ४ खासदारांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत, कायदेशीर बाजू तपाण्यास सुरूवात
दरम्यान, राज्यातील कमी पटसंख्यांच्या शाळांचे एकत्रिकरण करून समूह शाळांची उभारणी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील १४ हजार ७८३ शाळा बंद होण्याची भीती व्यक्त होत असून त्याचा परिणाम राज्यातील १ लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थी आणि २९ हजार ७०७ शिक्षकांवर होणार आहे. असे असताना शिक्षकांना पगार देण्यासाठी भंडारा जिल्हा परिषदेच्या तिजोरीत पुरेसे पैसे नाहीत, यामुळे जिल्ह्यातील ३२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. असंही राष्ट्रवादीने म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाऊ बहिणीच्या मदतीला धावणार, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या भेटीला
हेही वाचा…“आंबेडकरांनी ४८ जागा लढविण्याच्या वल्गना करू नये,” रामदास आठवलेंनी वंचितसोबत दिले युतीचे संकेत
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधी पक्षनेता मंत्रिमंडळात दिसेल,” भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?” महाराष्ट्राच्या अन्नदात्याला, विद्यादात्याला वाऱ्यावर सोडतात! ठाकरे गटाची टिका
हेही वाचा…अजित पवार गटाची जॅम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश