मुंबई: राज्यांना अधिकार देऊन काही फायदा होणार नाही. तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढणं गरजेचं असल्याचं मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. त्यावर आता अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडी सरकारची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशी असल्याची खोचक टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलीय.
हे पण वाचा: झिकाचे संक्रमण नाही, घाबरून जाऊन नका! आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
मराठा आरक्षणासाठीची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राज्यातल्या मराठा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. यावरून सत्तेतील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेला भाजप एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आणि राज्यात पुन्हा एकदा मराठा क्रांती मूक मोर्चाची हाक देण्यात आली. यांनतर संभाजीराजेंनी राज्यव्यापी दौरा करत, काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आणि नंतर आंदोलनाचा इशारा दिला.
हे पण वाचा: पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक
दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमाला कारणीभूत असलेल्या १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल केले जावेत, अशी मागणी सातत्याने केली जात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल केला आहे. या नव्या बदलांना आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली.
हे पण वाचा: जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचंच नाही. ज्यावेळी राज्यांना अधिकार हवा होता त्यावेळी ते मागणी करत होते. आता केंद्र सरकारनं निर्णय घेतला तर त्यावरही टीका केली जात आहे. केंद्र सरकारची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे. त्यामुळे १०२व्या घटनादुरुस्तीत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. मात्र, राज्य सरकारची हतबलता असल्यामुळे ते आरक्षण देऊ शकत नाहीत, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. आरक्षण देण्याची भूमिका आणि धाडस अशोक चव्हाण यांच्यात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं. केंद्र सरकारनं आता निर्णय दिला असल्यामुळे राज्य सरकार हात वर करत आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
Read Also :
- राज्यपालांचं जे स्थान आहे त्याला धक्का देण्याचं काम केलं जातय – चंद्रकांत पाटील
- सामान्यांचं स्वप्न सत्यात उतरणार, यंदा म्हाडा ९ हजार घरांची लॉटरी काढणार
- “शिवसेनेत नाकारल म्हणून बेताल वक्तव्य ,” चित्रा वाघ यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर
- मराठा आरक्षण: ‘केवळ राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही!’ अशोक चव्हाण म्हणतात….
- ब्रेकिंग! १०२ व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आरक्षणाचे अधिकार आता राज्यांना मिळणार