नवी मुंबई : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पती गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हंटले आहे. यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. अखेर बुधवारी रात्री काळे यांच्या पत्नीने नेरुळ पोलीस ठाण्यात पती गजानन काळे यांच्या विरोधात तक्रार केली. त्यानुसार अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी
गजानन काळे यांची पत्नीने नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी रात्री एफआयआर दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा FIR मध्ये उल्लेख आहे. मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“मराठा, धनगर समाजाप्रति भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं” शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं
एवढंच नाहीतर गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर तो घरात अन्याय करीत असल्याचंही FIR मध्ये उल्लेख केला आहे. तसंच, “२००८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतर १५ दिवसांनी गजानन माझासोबत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सावळा रंग व माझी जात कारणावरून मला टोमणे मारू लागला, जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तो मला बोलला की, तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही असे बोलला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यावेळी गजानन याने मला मारहाण केली होती” असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना एफआयआरमध्ये सांगितलं आहे. माझ्या जीवाला धोका असून माझं काही बरं वाईट झालं तर गजानन काळे जबाबदार असतील असेही त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
कोण आहेत गजानन काळे
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली. राज ठाकरे यांचा आक्रमक स्वभाव आणि भाषणशैलीवर प्रभावीत होऊन अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला. त्यात गजानन काळे यांचाही समावेश होता. त्यांनीही मनसेत प्रवेश केला. मनसेत आल्यानंतर त्यांनी कामाचा धडका लावला. गणेश नाईक यांचं नवी मुंबईवर अधिराज्य आहे. त्यातच शिवसेनाही बलवान आहे. ही सर्व आव्हाने असताना काळे यांनी नवी मुंबईत मनसेचं संघटन मजबूत करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
कोरोना निर्बंध आता आणखीन शिथील; या नवीन निर्बंधांची होणार १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
काळे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांची मनसेच्या औरंगाबाद संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली. औरंगाबादमधील त्यांच्या कामाचं कौतुकही केलं. काळे यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून २०१९ निवडणूक लढवली. त्यात त्यांना अपयश आलं. पण त्यांनी चांगली मते घेतल्याने चर्चेत आले होते.
Read Also :
- बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, आम्ही लढत राहू! काँग्रेसचा निर्धार
- “भिक मागा, भिक मागा भाजपवाले भिक मागा, वकिलांच्या फीसाठी भिक मागा,” पुण्यात शिवसेनेचे आंदोलन
- “आम्हाला वाटले आम्ही हिंदुस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर आहोत, ही कसली लोकशाही?”
- महापालिका रणधुमाळी: सत्ताधारी भाजपचे कमळ पाण्यात बुडणार? २०२२ वाजणार घड्याळाची टिक-टिक!
- देशमुखांच्या कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच, ईडीच्या हाती आणखीनही महत्त्वाचे पुरावे