परभणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात मुस्लिम धर्म स्विकारण्याचा विचार आला असता तर या भारताचे दोन तुकडे झाले असते. असं वादग्रस्त विधान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत. यामुळे आता राज्यात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर आता पुन्हा या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
जर बौद्धांच्या मार्गावर आपण चाललो तर हा देश किंवा जग शांततेच्या मार्गावर चालेल. बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी धर्मांतर करत असतांना ती बौद्ध धर्माबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी बाबासाहेबांनी इतर धर्मात येण्यासाठी अनेकांनी आग्रह केला होता. त्यावेळस जर बाबासाहेबांनी वेगळी भूमिका घेतली असती तर आज जे राज्यकर्ते दिल्लीत बसून विष पेरताहेत. दोन धर्मामध्ये भांडणं लावताहेत. तर देशाचे दोन तुकडे झाले असते. अशी शक्यता विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“असे गुन्हे माझ्यावर होत असतील तर बाळासाहेबांना याचा अभिमान वाटत असेल”, आदित्य ठाकरे आक्रमक
दरम्यान, परभणी येथे रविवारी थायलंड येथील सहा फूट उंचीच्या ५० बुद्धरूप मुर्तीेचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केले आहे. त्याचबरोबर मंदिरातील दानपेट्या काढून टाकल्या, तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही. असं विधानही वडेट्टीवार यांनी केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी नेमकी कुणाची ? निवडणुक आयोगात होणार फैसला, सुनावणीसाठी शरद पवार अन् अजित पवार राहणार उपस्थित
हेही वाचा…“नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासणं कितपत योग्य”? शरद पवारांवर कायदेशीर कारवाई करणार, जाधवांचा इशारा
हेही वाचा…पुण्यात मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, भुजबळांच्या वक्तव्यावरही चर्चा
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नामदेव जाधवांवर हल्ला, हल्ल्याची जबाबदारी ‘या’ नेत्याने स्विकारली
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट