मुंबई : मुंबईकरांसाठी महाराष्ट्रसाठी लढत असताना जर माझ्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान वाटेल. मुंबई आम्ही लुटू देणार नाही, महाराष्ट्र आम्ही झूकू देणार नाही. असं म्हणत ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील लोअर परेल पुलाचं उद्घाटन केल्याप्रकरणी महापालिकेने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“मुंबईकरांचा पाणी होणार महाग, पाणी पट्टीत तब्बल ८ टक्क्यांनी वाढ,” काॅंग्रेसचा प्रचंड विरोध
राज्यपालांना पत्रव्यवहार करून विनंती केली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना समज द्यावी, की जेवढे दिवस सरकार आहे, तेवढे दिवस कामावर लक्ष द्या. अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना फक्त घाणेरडं राजकारण जमतं. थोड कामावर लक्ष द्या. असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच, मुंबईत गुन्हा दाखल, भाजप नेत्याने डिवचलं
दरम्यान, मुंबईतील लोअर परेल पुलाचं उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. लोअर परळ पुलाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे यांच्यावर केला असून एकूण चार कलमांच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुलाची स्थिरता चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांच्याकडून पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या, ठाकरे गटातील खासदारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे करतात ती दडपशाही”, भाजप नेत्याची टिका
हेही वाचा…“संभाजी राजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत,”,छगन भुजबळांनी संभाजी राजेंना सुनावलं
हेही वाचा…मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतली सर्वात मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या
हेही वाचा…“तर प्रत्येक व्यक्तीने विष घेऊन मेलेलं बरं,” जरांगे पाटलांच्या भेटीनंतर उदयन राजेंचं मोठं विधान