मुंबई : आदित्य ठाकरे यांच्याकडून गुरूवारी लोअर परळमधील पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन केलं. दिवाळीपुर्वी डिलाईन रोडवरील संपूर्ण पुल सुरू करण्याची ठाकरे गटाची मागणी होती. त्यानंतर पुल खुला न झाल्यानं आदित्य ठाकरे यांच्याकडून गुरूवारी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. यातच आता मुंबई पालिकेच्या तक्रारीनंतर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांत आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता भाजपच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…“ओबीसींच्या सभेला पक्षाने पाठवलं नाही,” पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे करतात ती दडपशाही आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. विकास कामाचा उद्घाटन झाल्यानंतरच ते जनतेच्या सेवेमध्ये सुरू करण्यात येतो. हा नियम आहे. तुम्ही जर कायदाच मानणार नसाल आणि कायदा हातात घेऊन वातावरण खराब करण्याचं काम करत असाल तर त्यानुसार कारवाई होते. त्यामुळे ही कारवाई योग्य आहे. जर असं वागायला लागलात तर इतरही लोकांचं धाडस वाढेल आणि बजबजपुरी माजेल. असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा…अंजली दमानिया यांना पोलिसांनी भुजबळांच्या घराबाहेर रोखलं, महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झाली बाचाबाची
दरम्यान, मुंबईतील लोअर परेल पुलाचं उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. लोअर परळ पुलाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे यांच्यावर केला असून एकूण चार कलमांच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुलाची स्थिरता चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांच्याकडून पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संभाजी राजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत,”,छगन भुजबळांनी संभाजी राजेंना सुनावलं
हेही वाचा…मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतली सर्वात मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या
हेही वाचा…“तर प्रत्येक व्यक्तीने विष घेऊन मेलेलं बरं,” जरांगे पाटलांच्या भेटीनंतर उदयन राजेंचं मोठं विधान
हेही वाचा…“मुंबईकरांचा पाणी होणार महाग, पाणी पट्टीत तब्बल ८ टक्क्यांनी वाढ,” काॅंग्रेसचा प्रचंड विरोध
हेही वाचा…आदित्य ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच, मुंबईत गुन्हा दाखल, भाजप नेत्याने डिवचलं