मुंबई : मुंबई महापालिकेने पाणी पट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लिटरमागे २५ पैसे ते सहा रूपयांपर्यत ही वाढ प्रस्तावित असून या दरवाढीला आता काॅंग्रेसने विरोध केला आहे. तर काॅंग्रेसच्या नेत्या आणि मुंबई शहाराध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…सरकारमधीलच मंत्री अन् आमदारामध्ये शाब्दिक चकमक, पक्ष श्रेष्ठींकडे भाजप आमदार तक्रार मांडणार
मोदी सरकारपायी उभ्या ठाकलेल्या महागाई आणि बेरोजगारीने सर्वसामान्य मुंबईकरांचे कंबरडे मोडले असतानाच आता या जनविरधी सत्तेला मनमानी पद्धतीने पाणी पट्टी दरवाढ, गोरगरिब, मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या माथी लादायची आहे. जनतेचा विरोध डावलून, लोकशाही बाजूला सारून यांनी नेमलेल्या प्रशासक पाणीपट्टी दरात पुर्वलक्षी प्रभावाने ८ टक्के वाढ करण्याच्या तयारीत असल्याचं वर्षा गायकडवा यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग, फडणवीसही हजेरी लावणार, तर अजित पवार गटाचा विरोध
एकाबाजूला आपल्या व्यावसायिक मित्रांना घसघशीत सवलती देऊ करायच्या आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य व प्रामाणिक करदात्यांवर दरवाढीचा बोझा टाकायचा. असले यांचे उद्योग सुरू आहेत. महापालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे एकतर मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलेय.
हेही वाचा…मुंबईत वाद पेटणार, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक
दरम्यान, अवेळी पाणीपुरवठा बंद आणि पाणीबाणीची झळा गोर गरीबांना सहन करावी लागत आहे, टँकर माफियांच्या जाचाला सहन करावे लागतेय. अशा वेळी सामान्यांवर पाणीपट्टी दरवाढ लादण्याचा पाप ही मंडळी करत आहे. हे चालणार नाही. महापालिकेमध्ये सध्या यांचे प्रशासकराज चालू आहे. प्रशासकाला जाब विचारण्यासाठी नगरसेवक नाहीत, सगळे काही मनमानी पद्धतीने सुरू आहे. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…आदित्य ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच, मुंबईत गुन्हा दाखल, भाजप नेत्याने डिवचलं
हेही वाचा…“ओबीसींच्या सभेला पक्षाने पाठवलं नाही,” पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…अंजली दमानिया यांना पोलिसांनी भुजबळांच्या घराबाहेर रोखलं, महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झाली बाचाबाची
हेही वाचा…एल्गार सभेनंतर मराठा समाज आक्रमक, भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
हेही वाचा…ओबीसींच्या एल्गार सभेला गैरहजर का ? पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…